3gram_20panchayat_20election_5 
छत्रपती संभाजीनगर

Grampanchayat Elections : ग्रामपंचायतसाठी आज माघारीचा शेवटचा दिवस, उमेदवारांना चिन्ह वाटप होणार

शेखलाल शेख

औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी (ता.४) अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस असून मैदानात राहिलेल्या उमेदवारांना दुपारी तीननंतर चिन्ह वाटप केले जाणार आहे. चिन्ह मिळताच ग्रामपंचायतीसाठी खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात होणार आहे.
जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकीसाठी छाननीअंती १६ हजार ९४२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. आत अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम दिवस असल्याने अनेकांनी फिल्डींग लावून उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्न केले.

सोमवारी दुपारी तीन नंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची अंतिम चित्र स्पष्ट होईल. जिल्ह्यात वैजापूर २६४९, सिल्लोड २३१९, कन्नड २०४३, पैठण २४५४, औरंगाबाद २१८१, गंगापूर २२२६, फुलंब्री १४४८, सोयगाव ९५३ तर खुलताबाद तालुक्यातील ६६९ उमदेवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात १२ लाख ४६ हजार ५३६ मतदार मतदान करतील. १५ जानेवारीला मतदान होईल. जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींमध्ये २०९० प्रभागांसाठी ५,६८३ सदस्यसंख्या राहणार आहे.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT