Aurangabad Gram Panchayat Election Results esakal
छत्रपती संभाजीनगर

Gram Panchayat Result : निवडणुकीत सख्या मावस भावांच्या बायका, मतंही पडली समसमान; शेवटी 'असा' दिला निकाल

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा हटके निकाल हाती आलाय.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीचा हटके निकाल हाती आलाय.

Aurangabad Gram Panchayat Election Results : राज्यात गेल्या रविवारी पार पडलेल्या 7135 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काही जिल्ह्यात बिनविरोध निवड झाली. तर काही ठिकाणी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली होती. आता त्याचे सर्व निकाल हाती येत आहेत.

औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील (Kannada Taluka) एका ग्रामपंचायतीचा असाच काही हटके निकाल हाती आलाय. सख्या मावस भावांच्या बायका ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, मतमोजणी सुरु असतानाच दोन्ही उमेदवारांना समान मत मिळाल्यामुळं ईश्वर चिठ्ठी काढावी लागली. त्यानंतर एकीचा विजय तर दुसरीचा पराभव झाला आहे. कन्नड तालुक्यातील गराडा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन सख्या मावस भावांच्या अर्धांगणी निवडणुकीत आमने-सामने होत्या.

पूजा सचिन राठोड या उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तर रेश्मा राहुल राठोड एकनाथ या शिंदे गटाकडून रिंगणात होत्या. दोन्ही गटाकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. दरम्यान आज मतमोजणी वेळी दोघींना 540 मतदान झाल्यामुळं चिठ्ठी काढण्यात आली. यात पूजा सचिन राठोड यांचा विजय झालाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Survey: मराठी संवर्धनासाठी महायुती सरकारचे प्रयत्न कितपत यशस्वी? ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात उलगडलं चित्र

Silent Diseases Alert: 'हे' ५ शांतीत क्रांती करणारे आजार कधीच दाखवत नाहीत लक्षणं; डॉक्टर देतात वेळीच सावध होण्याचा इशारा

Latest Marathi News Live Update : दुबई मरीना बीचचा रोमांच आता थेट मुंबईच्या जुहू समुद्रकिनारी अनुभवता येणार

Sakal Survey 2025: महायुती सरकारची वर्षपूर्ती! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी कशी होती?

Redmi 15C 5G मोबाईल लॉन्च! 'या' तारखेपासून विक्री सुरू; 12 हजारात बेस्ट कॅमेरा अन् 6300 mAh मोठी बॅटरी, 50 हजारच्या फोनचे फीचर्स

SCROLL FOR NEXT