Villagers Burned Sarpanch Chair
Villagers Burned Sarpanch Chair 
छत्रपती संभाजीनगर

संतप्त गावकऱ्यांनी पाण्यासाठी जाळल्या ग्रामसेवक, सरपंचांच्या खुर्च्या! वारंवार विनंती करुन ही होईना उपयोग

बाबासाहेब ठोंबरे

पीरबावडा (जि.औरंगाबाद) : फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील गावकऱ्यांना गेल्या आठ दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे वारंवार मागणी केल्यानंतरही ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आदी पदाधिकारी पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरल्याने त्यांच्या खुर्च्या रविवारी (ता.दहा) जाळण्यात आल्या.


गेल्या आठ दिवसांपासून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरले आहे. त्यांना वारंवार विनंती केल्यानंतरही पाणीपुरवठा होऊ शकला नाही. म्हणून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच याच्यां खुर्चा जाळल्या. या नंतरही २४ तासांत पाणीपुरवठा न केल्यास सरपंच व ग्रामसेवक यांना गाव बंदी करण्यात येईल, असा इशारा प्रहार युवा तालुकाध्यक्ष मंगेश साबळे यांनी दिला आहे
 

एका दिवसापूर्वी विद्युत पंप खराब झाल्याने गावाला एक दिवस पाणी नाही भेटले. परंतु आम्ही औरंगाबाद येथे महावितरण अभियंता भेट घेण्यासाठी गेलो असता. गावांमधून फोन आला की मंगेश साबळे यांनी पेट्रोलची बाटली घेऊन ग्रामपंचायत कुलूप तोडून महत्त्वाची कागदपत्रे रक्कम व ग्रामसेवक व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य  यांच्या खुर्च्या जाळून टाकल्या. या प्रकरणी आम्ही ग्रामसेवक व आम्ही मध्यरात्री पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहोत.
- भाऊसाहेब साबळे, उपसरपंच, गेवराई पायगा

 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT