रस्ता.jpg
रस्ता.jpg 
मराठवाडा

केंद्रीयमंत्री गडकरी यांचा दावा ठरला खोटा, औशातील महामार्गाला वर्षभरातच तडे !  

जलील पठाण

औसा (लातूर) : केंद्रीय दळणवळण मंत्री व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे नेहमी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाबाबत नेहमीच विश्‍वास व्यक्त करुन नव्याने विकसीत झालेले रस्ते हे दर्जात्मक असल्याचा दावा करतात. मात्र, त्यांच्या या दावा आता सपशेल खोटा ठरु लागला आहे. औसा तालुक्यातुन जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट बांधकामाचे पितळ आता उघडे पडले आहे.


रत्नागिरी ते वारंगा फाटा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर औशा तालुक्यातील बेलकुंड ते आशीव या दरम्यान गतवर्षी झालेल्या सिमेंट रस्त्याला तडे पडले आहेत. औशाच्या तुळजापुर चौक ते लाजना-उमरगा रस्त्याचे काम अजुन संपले नसतांना मागे झालेल्या नविन सिंमेट रस्त्यालाही भेगा पडल्या आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करुन आणि या खर्चाचा टोल जनतेच्या खिशातुन वसुल केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणार्या अधिकार्यांना हे निकृष्ठ काम दिसत नाही का. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात नविन रस्त्यांचे जाळे विनत अनेक शहरे एकमेकांना जोडली. त्यांच्या कामा बाबत विरोधकांनाही शंका नाही. कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देत त्यांनी राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती करीत आधुनिक भारताचा पाया रोवण्याचा प्रामाणीक प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कल्पनेतील निर्माण होनाऱ्या सिंमेट रस्त्यांच्या दर्जा बाबत किमान पन्नास वर्षे हे रस्ते टिकतील असा विश्वास बोलुन दाखविला होता.

औशा तालुक्यातून जाणाऱ्या या दोन्ही सिमेंट महामार्गाच्या दुर्दशेकडे पाहीले की, संबंधीत गुत्तेदाराने मंत्री श्री गडकरी यांच्या स्वप्नांना छेद दिला आहे. औसा-लामजना-उमरगा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ (ब) चे काम अद्यापी पूर्ण झालेले नाही. फक्त रस्ता तयार झाला असुन अनेक पुलाचे काम अजुन बाकी आहे. मात्र झालेल्या रस्त्याला चक्क लांबलचक भेगा पडल्या आहेत. या भेगाच कामाच्या गुणवत्तेची साक्ष देत असल्याचे बोलले जात आहे. 

तर औसा तुळजापुर मधुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ लाही बेलकुंड ते आशीव दरम्यान भेगा पडल्या आहेत. त्या थातुर मातुर बुजविण्यात आल्या असल्या तरी गुत्तेदाराचे आणि या राष्ट्रीय महामार्गावर देखरेख करनाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचे पितळ उघडे करणाऱ्या आहेत. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या चाललेल्या कामाच्या दर्जाचे मुल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशातून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT