sallgadi 
मराठवाडा

...यामुळे हवे सालगड्यांना लाखाचे पॅकेज

राजेश दारव्हेकर

हिंगोली : गुढी पाडव्याचा सण दहा ते अकरा दिवसावर आला आहे. ग्रामीण भागात सालगडी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र प्रत्येक गावात बोटावर मोजण्या इतकी संख्या सालगड्यांची झाली आहे. काही वर्षांपासून होणाऱ्या भाववाढीचा फटका सालगड्याच्या मानधनावर झाला आहे. त्यामुळे सालगड्याचे भाव चांगलेच वाढले असून लाखाचे पॅकेज मागितले जात आहेत.

शेतकऱ्याचे नवीन वर्ष गुढी पाडव्यापासून सुरू होते. या दिवशी शेतकरी औत पूजन करतात. त्याच बरोबर शेतकरी जुने सालगडी बदलून नवीन सालगडी ठेवतात. तर काही जण जुन्याच सालगड्यांना वाढ करून किंवा मागच्याच दिलेल्या सालावर कायम ठेवतात. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने त्‍याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पूर्वी गावात अशिक्षीत व्यक्‍ती सालगडी म्‍हणून काम करत असत. 

रक्कमेत केली वाढ

आता मात्र काही शिक्षण असलेले देखील सालगडी म्‍हणून काम करीत आहेत. यामुळे सालगड्यात देखील संघटन झाले आहे. त्‍यांची संख्या मात्र मोजकीच असली तरी नवीन सालगडी तयार होत नसल्याने जुन्याच गड्यावर साल धरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. गावात किती साल द्यावे, याचा अंदाज हे सालगडी बांधत आहेत. वाढत्या महागाईमुळे सालगड्यांनी यावर्षी सालाच्या रक्‍कमेत वाढ केली आहे. मागच्या वर्षी ऐंशी ते पंच्याशी हजार रुपये असणारे पॅकेज आता लाखावर पोचले आहे. त्यातही वीस ते पंचवीस हजार नगदीची मागणी करीत असल्याचे शेतकरी उत्तमराव पवार यांनी सांगितले.

ठोक्‍याने देताहेत जमीन

 कोरडवाहू जमिनीवर काम करणाऱ्या सालगड्यांना साठ ते सतर हजार रुपये साल व वर्षाची सालचंदी असते. यात धान्यांचा समावेश असतो. बऱ्याच गावात सालगडी मिळत नसल्याने दुरवर जाऊन सालगड्याचा शोध घ्यावा लागत आहेत. बहुतांश गावात शेतात सालगडी म्‍हणून राहणाऱ्यांची संख्या मोजकीच झाली आहे. सध्या ग्रामीण भागात सालगडी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी सालगडी अर्धवट कामे सोडून जात असल्याने सालगड्या ऐवजी वाटेकरी पाहून त्‍यांना कसण्यासाठी जमीन देत आहेत. तर काही ठोक्‍याने देखील जमीन देत आहेत.

टॅक्‍ट्ररद्वारेच शेतीची कामे

शेती आता निसर्गावर अवलंबुन झाल्याने दिवसेंदिवस शेतकरी उत्‍पन्नात अडचणीत आहेत. त्‍यामुळे अनेकांनी टॅक्‍ट्ररवरच मशागत, पेरणी, कापणी, मळणीची कामे रोजदारा मार्फत देखील करणे सुरू केले आहे. सालगडी परवडत नसल्याचे शेतकरी बाबूराव पतंगे यांनी सांगितले. मागच्या वर्षी खरीपाच्या पिकाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले. त्‍यानंतर शेतकऱ्यांना रब्‍बीच्या पिकात उत्‍पन्नाची आशा होती. 

पिकांच्या नुकसानीने शेतकरी चिंतेत

मात्र बहुतांश शेतकऱ्याचे वातावरणाचा बदल, अवकाळी पाऊस यामुळे पिकाचे नुकसान झाले असल्याचे श्री. पतंगे म्हणाले. त्‍यामुळे शेतात काम करणाऱ्या सालगड्याला काय द्यावे, घरी काय ठेवावे असा प्रश्न निर्माण होत आहे. कापणी, मळणी, निंदण, फवारणी याचा खर्च काढल्यास उत्‍पन्न किती होते, याचा अंदाज बांधले जात आहेत. त्‍यामुळे ठोक्याने जमीन देण्याकडे अनेकांचे लक्ष आहे.

वाढीव साल मिळणार 

दरवर्षी वाढत असलेली महागाई यामुळे मागच्या वर्षीच्या सालात वाढ करावी अशी अपेक्षा असते. दिंवसेंदिवस खर्चात वाढ होत आहे. त्‍यामुळे शेतात काम करून मुलांचे शिक्षण, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह, आरोग्य आदी गोष्टी सांभाळून कामे करावे लागत आहेत. दहा ते बारा वर्षांपासून शेतात सालगडी म्‍हणून काम करतो. महागाईच्या प्रमाणात सालात वाढ देखील मालक करतात. यावर्षी देखील वाढीव साल मिळणार आहे.
- बालाजी बोडखे, सालगडी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT