crime news
crime news crime news
मराठवाडा

प्रेम संबंधात अडथळा निर्माण करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून

वैजिनाथ जाधव

गेवराई (बीड): राजापूर शिवारात सापडलेल्या पस्तीस वर्षीय ज्ञानेश्वर चव्हाणचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोनच दिवसात जलद गतीने सुत्रे फिरवत खून करणारे दोन आरोपी ताब्यात घेतले असून प्रेम संबंधात अडथळा निर्माण होत असल्याने मयताच्या पहिल्या पत्नीने व प्रियकराने खून केला उघड झाले आहे.

तालुक्यातील राजापूर शिवारात शनिवार (१ मे) रोजी ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण (वय 35) (रा.गोळेगाव) यांचा मृतदेह नाकातून रक्त येत असलेल्या व गळ्यावर मारल्याचे निशाण असलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आला होता. तलवाडा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या प्रकरणाची तलवाडा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान तलवाडा पोलिसांना खूनाचा संशय आल्याने त्यांनी जलद गतीने तपासाची सूत्रे फिरवून व गोपनीय माहितीदारांकडून माहिती घेतली. त्यात ज्ञानेश्वर चव्हाण यांना गोसावी वस्तीवरील नाना आप्पा शिंदे व मयताची पहिली पत्नी छाया ज्ञानेश्वर चव्हाण यांनी त्यांच्यात असलेल्या प्रेम संबंधात अडथळा निर्माण होत असल्याने कट रचून ज्ञानेश्वरचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले.

ज्ञानेश्वर चव्हाण यास नाना शिंदे यांनी बोलवून दारू पाजून राजापूर शिवारात रघुनाथ खेडकर यांच्या शेतात दोरीने गळा आवळून खून केला असल्याचे आरोपीने कबूल केले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदरील कामगिरी तलवाडा ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे, पोलीस नाईक खाडे यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT