नांदेड - राज्यातील येणाऱ्या २०१९ च्या लोकसभा निवडणूका भाजपा व शिवसेनेने एकत्र लढविल्या तर पुन्हा युतीची सत्ता येणार असे भाकीत केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी नांदेडमध्ये वर्तवले. म्हणून लोकसभेच्या निवडणुका भाजप आणि शिवशेनेने एकत्र लढवायला हव्यात. जर युती झाली नाही तर याचा जास्त फटका शिवसेनेला बसणार असेही मत आठवले यांनी व्यक्त केले.
केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले बुधवारी (ता. सहा) नांदेड दौऱ्यावर आले असता शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी मोदी सरकारच्या चार वर्षाच्या कामाची स्तुतीही यावेळी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.