balkumar
balkumar 
मराठवाडा

बालकुमार साहित्य संमेलनातून संस्कारक्षम पिढी निर्माण होते ः आमदार डॉ.पाटील

गणेश पांडे

परभणी : मराठी विभागीय बालकुमार साहित्य संमेलन होणे ही काळाची गरज असून अशा उपक्रमातून खऱ्या अर्थाने संस्कारक्षम पिढी निर्माण होते, असे प्रतिपादन परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मंगळवारी (ता.२४) मत व्यक्त केले.
अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे अंतर्गत जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आयोजित विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या समारोप मंगळवारी रात्री झाला. या वेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष एकनाथ आव्हाड, उद्‍घाटक कवी प्रा.इंद्रजीत भालेराव, केंद्रीय कार्यकारिणी कार्यवाहक मुकुंद तेलीचेरी, प्रशांत गौतम, केशव बा. वसेकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुचिता पाटेकर, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, कादंबरीकार प्रा.भारत काळे, शीतल सोनटक्के आदींची उपस्थिती होती. आमदार डॉ.पाटील म्हणाले, संस्कारक्षम वयामध्ये वाचन व लेखनाने विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार होऊन एक आदर्श पिढी तयार होऊ शकते. यासाठी अशा उपक्रमांची गरज असून अभ्यासक्रमातही अशा उपक्रमांचा सहभाग करावा, असेही मत व्यक्त केले. या वेळी कथा लेखन स्पर्धेत ग्रामीण व शहरी गटातून पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. श्रेया लव्हेकर, सावरी जोशी, समृद्धी महाजन, जयदीप चव्हाण, संजना आसेवार, रेणुका चव्हाण, आरती चंदेल, अभिलाषा शिंदे, साक्षी कच्छवे, मीरा देवडे या विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली. शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर व विठ्ठल भुसारे यांनी ग्रामीण व शहरी भागातून या संमेलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या साहित्यिक वाटचालीला शुभेच्छा दिल्या. कविता इंद्रजित भालेराव यांच्या ‘ग्रंथ हमारे गुरु’ या कवितेने कार्यक्रमाचा समारोप झाला. अरविंद सगर यांनी सूत्रसंचालन केले तर त्र्यंबक वडसकर यांनी आभार मानले. 

साहित्यिकांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
दुपारच्या सत्रात बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे व्यासपीठावर ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ हा कार्यक्रम सादर झाला. केंद्रीय कार्यकारिणीचे कार्यवाहक मुकुंद तेलीचेरी यांच्या कथेने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणला. धनंजय गुडसूरकर यांनी रंजीत पद्धतीने मांडलेल्या अनुभवाने बालकांमध्ये उत्साह संचारला. नाट्यकलावंत मधुकर उमरीकर यांनी सादर केलेल्या ‘श्यामची आई’ एकपात्री प्रयोगातील प्रसंग सादरीकरण केला. त्यावेळी साने गुरूजींचे श्यामची आई पुस्तकातील प्रसंग विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले. प्रा.दीनानाथ फुलवाडकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अनुभव कथनातून वेगळ्या विश्वात पदार्पण करायला लावले. बालकवींचा कविसंमेलनात उस्फुर्त सहभाग संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात (कै.) देविदासराव कुलकर्णी व्यासपीठावर बालकवी संमेलन झाले. 

९६ बालकवींनी सहभाग
कविसंमेलनात जिल्ह्यातील ९६ बालकवींनी सहभाग नोंदवला. ग्रामीण व शहरी भागातून आलेल्या या कवींनी आपल्या रचना सादर केल्या. दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या कवी संमेलनात तब्बल दोन तास बालकवींनी सामाजिक आशयासह आई, शेतकरी, निसर्ग व शालेय जीवन आदी विषयाच्या कविता सादर केल्या. सहभागी बालकवींना बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT