लातूर लातूर
मराठवाडा

खायला अन्न अन् पिण्यासाठी पाणी नाही... मराठवाड्यातील वाड्या-तांड्यांवरील स्थिती

हाताला कामही नाही. खाण्यासाठी घरात अन्न नाही. पिण्यासाठी पाणी नाही त्यामूळे जगावे कसे असा प्रश्न उभा आहे

शिवशंकर काळे

जळकोट (लातूर): तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाडी-तांडे असून लॉकडाउनमुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. त्यामूळे कुंटूब प्रमुखांना कुंटूब जगविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. तालुक्यातील अनेक तांड्यावरील बंजारा समाजातील नागरिकांना खाण्यासाठी अन्न नाही, पिण्यासाठी पाणी नाही, हाताला काम नाही त्यामूळे त्यांचे लॉकडाउनकाळात हाल होत आहेत.

बंजारा समाजाचा मुख्य व्यवसाय ऊसतोड करणे, जनावरे पाळणे हा आहे. ऊस कामगार लॉकडाऊनमुळे आपापल्या घरी परत आला आहे. एका कुंटूंबात चार ते पाच जण असतात. त्यामध्ये वृद्धांची संख्या जास्त असते. काम केल्याशिवाय चूल पेटत नाही. लॉकडाऊनमुळे घराच्या बाहेर पडता येत नाही. त्यामुळे हाताला काम मिळत नाही. कुंटूबाला दररोज दोन तीनशे रुपये पोट भरण्यासाठी लागतात. पंरतू खिसाच रिकामा असल्याने खाण्यासाठी काय खरेदी करायचे असा प्रश्न त्याच्यासमोर उभा आहे.

दरम्यान गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये अनेक संस्था पुढे येऊन वाडी- तांड्यावरील जनतेच्या पोटाला हातभार लावला होता त्यामुळे कुंटूबांच्या पोटाचा प्रश्न सुटला होता. पंरतू आता दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमध्ये मदत करण्यासाठी कोणीही पुढे येताना दिसत नाही. अन्ना बरोबरच अनेक तांड्यावर पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. एक घागर पाणी आणण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर जावे लागत आहे. एक किलोमीटर जाण्यासाठी अंगात अवसान तर पाहिजे आणि पोटातच काही नसल्याने अंतर गाठणेही अवघड आहे.

हाताला कामही नाही. खाण्यासाठी घरात अन्न नाही. पिण्यासाठी पाणी नाही त्यामूळे जगावे कसे असा प्रश्न उभा आहे. शासनाने मोफत रेशन देण्याची घोषणा केली असली तरी अद्याप गोरगरींबाना रेशन मिळाले नाही. त्यामूळे अशा गरजू लोकांना तातडीने रेशन देऊन जगण्यासाठी बळ देण्याची गरज आहे. अनेक संस्था सामाजिक कार्य करतात आशा वाडी तांड्यावरच्या गोरगरीब कुंटूबाला आर्थीक आधार दिल्यास त्यांना जगण्याचे बळ मिळणार आहे.

लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने सर्व कुंटूब घरात आहे. शिल्लक असलेले घरातील अन्न संपले आहे. पिण्यासाठी पाणी नाही. शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे कुंटूबावर उपाशी झोपण्याची वेळ आली आहे. शासनाने तातडीने आर्थिक मदत केल्यास आम्हाला जगण्यासाठी आधार मिळणार आहे.

-संजय आडे, शिवाजीनगर तांडा (माळहीप्परगा, ता.जळकोट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT