लातूर : ज्ञानरचनावाद व गुणवत्ता संवर्धन कार्यशाळेत विक्रम काळे यांनी शनिवारी शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी औदुंबर उकिरडे, डी. एन. केंद्रे, बी. जी. चौरे उपस्थित होते.  
मराठवाडा

जड दप्तराविना शाळांचा प्रयोग राबवा

सुशांत सांगवे

लातूर : गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतानाच दप्तराचे ओझे कमी असलेल्या शाळा निर्माण करण्याची गरज आहे, असे मत शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. प्रत्येक शनिवारी मुलांनी दप्तर आणायचे नाही. हा प्रयोग सर्व शाळांनी प्राथमिक स्वरूपात लागू करावा. तो यशस्वी झाल्यास दप्तरांचे ओझे नसणाऱ्या शाळा निर्माण होतील, असेही ते म्हणाले. 


राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात शिक्षकांसाठी एकदिवसीय ज्ञानरचनावाद व गुणवत्ता संवर्धन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी काळे बोलत होते. संस्थेचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्राचार्य बी. जी. चौरे, शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, वरिष्ठ अधिव्याख्याता विजयकुमार सायगुंडे, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव पाटील, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्याक्ष प्रकाश देशमुख, प्राचार्य बाबूराव जाधव, संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, प्राचार्य संगमेश्‍वर केंद्रे, मुख्याध्यापक स्वाती केंद्रे, वरिष्ठ अधिव्याख्याता अनिल मुरकुटे, सतीश सातपुते, नागेश लोहारे, मारुती कदम, बालाजी शेळके, प्रा. कविता केंद्रे, प्रा. अश्‍विनी केंद्रे उपस्थित होत्या. 

विद्यार्थी आहेत म्हणून शाळा आहेत.
काळे म्हणाले, की विद्यार्थी आहेत म्हणून शाळा आहेत. शाळा आहेत म्हणून शिक्षक आहेत, याचा विसर पडता कामा नये. शिक्षकांनी विद्यार्थी केंद्रबिंदू माणून ज्ञानदानाचे कर्तव्य पार पाडावे. वेगवेगळ्या प्रयोगांतून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावावी. उकिरडे म्हणाले, की शिक्षणक्षेत्रातील नवीन विचारप्रवाह शिक्षकांपर्यंत पोचला पाहिजे. तो शिक्षकांनी स्वीकारला पाहिजे. आपण शंभर टक्के निकालाच्या मागे लागलो आहोत. या शंभर टक्‍क्‍यांत किती विद्यार्थी शास्त्रज्ञ होतील, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

काळाची पावले ओळखावीत

काळाची पावले ओळखून विद्यार्थी घडविला पाहिजे. शिक्षकांनी हे काम कर्तव्यभावनेतून करण्याची गरज आहे. चौरे म्हणाले, की विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच दैनंदिन घडामोडींवर आधारित प्रश्‍नांची उत्तरे देता आली पाहिजे. त्यासाठी त्यांना चालना देण्याची गरज आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी नकारात्मक नव्हे, तर सकारात्मक भावनेतून संवाद साधला पाहिजे, असे नमूद करून यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्ञानाची चव चाखता आली पाहिजे. पर्यवेक्षक एस. व्ही. वायचळ यांनी सूत्रसंचालन केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

Kolhapur Crime News : वंशाला दिवा पाहिजे म्हणून, कोल्हापुरात महिलेसोबत घडलं भयानक; नणंद, सासूने केलं धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Pune News: इंदापुरात २९ गायी-वासरांची सुटका; तीन वासरांचा गुदमरून मृत्यू, दोघांविरुद्ध गुन्हा, धक्कादायक चित्र समोर!

SCROLL FOR NEXT