hingoli photo 
मराठवाडा

जाणकार म्हणतात, लघू उद्योगांना मिळणार चालना

राजेश दारव्हेकर

हिंगोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड- १९ महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटाला तोंड देताना २० लाख कोटी रुपयांच्या मदतीची आर्थिक घोषणा केली. आर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या कार्यक्रमाला किंवा योजनेला पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अभियान म्हटले आहे. 

बुधवारी (ता.१३) अर्थमंत्री सीतारामन यांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठीच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यामुळे लघू उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला असून यामुळे उद्योगांना चालना मिळेल, अशी अपेक्षा विविध क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे

बांधकाम व्यवसायांना अच्‍छे दिन येणार

बांधकाम व्यावसायिकांना सहा महिने घर बांधकामात सूट दिल्यामुळे बांधकाम व्यवसायांना अच्‍छे दिन येणार आहेत. यामुळे बाजारात उत्साह वाढेल, इंकम टॅक्‍स भरण्यासाठीदेखील मुदतवाढ मिळाली आहे. आयकर रिफंड तरतूद देण्याची मुभा मिळाली आहे. उद्योगाच्या विकासासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. लोकांनी स्वदेशी वस्तू वापरण्यावर भर देण्यात आला आहे. त्‍यामुळे उद्योगाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
- रमेशचंद्र बगडिया, अध्यक्ष, व्यापारी महासंघ


सर्वांना त्‍याचा लाभ होणार

सुक्ष्म व लघु उद्योगासाठी नॉन गॅरंटी लोन उपलब्ध देण्याची घोषणा केली आहे. त्‍याचा फायदा जवळपास ४५ लाख उद्योगांना घेता येणार आहे. एमएसएमईची गुंतवणूक मर्यादी जी २५ लाख होती. ती आता एक कोटीपर्यंत करण्यात आली आहे. नवीन परिभाषेमुळे सूक्ष्म व लघू उद्योगांची व्याप्ती वाढेल. आयकर रिटर्नची तारीख ३१ जुलै ऐवजी ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे. यामुळे सर्वांना त्‍याचा लाभ होणार आहे.
-प्रवीण सोनी, सचिव, हिंगोली जिल्हा औद्योगिक संघटना


शेतकऱ्यांसाठी आणखी मदतीची अपेक्षा

बाजारातील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न, लघू व मध्यम उद्योगाला विकासाकडे नेणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना भरपूर मदत देण्यात आली आहे. स्वदेशी कंपन्यांना भरीव आर्थिक व इतर मदत, शेतकऱ्यांना सरळ त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये मिळणार आहेत. समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने वाटचाल मात्र, शेतकऱ्यांसाठी आणखी मदतीची अपेक्षा होती.
-आनंद निलावार, हिंगोली जिल्‍हा सीड, फर्टी, पेस्‍ट, असोसिएशनचे अध्यक्ष

 

मदत सर्वांसाठी सुखकर ठरणार

विनासॅलरीधारकांचे टीडीएस (कमिशन एजेंट, रेंट, व्याज) यावरील कपात ही आधीच्या रेटच्या २५ टक्‍के करण्यात आली आहे. कंपनी सोडून सर्व इतरांनी इनकम टॅक्स रिफंड काही असेल तर ताबडतोब देण्यात येणार आहे. सरकारकडील थकबाकी असल्यास ४५ दिवसांत मिळणार आहे. यामुळे जनतेकडे तरलता (लिक्विडिटी) जास्त काळ टिकून राहण्यावर सरकारने भर दिला असल्याने ही मदत सर्वांसाठी सुखकर ठरणार आहे.
- राजेश सोमाणी, कर सल्लागार


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT