file photo
file photo 
मराठवाडा

अतिवृष्टी, कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा

माजलगाव (जि. बीड) - बॅंकेच्या कर्जास कंटाळून माजलगाव तालुक्‍यातील निपाणी टाकळी येथील शेतकरी नारायण अप्पाराव सोळंके (वय 50) यांनी शुक्रवारी (ता. 22) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, तालुक्‍यातील निपाणी टाकळी येथील शेतकरी नारायण सोळंके यांच्याकडे बॅंकेचे कर्ज होते. बॅंकेकडून वसुलीसाठी सतत तगादा असल्याने हा शेतकरी अडचणीत होता. सातत्याने निर्माण होणारा दुष्काळी व अतिवृष्टीमुळे संपूर्ण अर्थचक्र कोलमडले होते.

प्रापंचिक खर्च कसा भागवावा, या विवंचनेतच नारायण सोळंके गुरुवारी (ता. 21) घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी आलेच नाही. सर्वत्र शोधाशोध घेऊनही ते कुठेच सापडले नाहीत. निपाणी टाकळी शिवारातील शेतात बाभळीच्या झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी पुतण्या श्रीकिसन शिवाजी सोळंके यांच्या माहितीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT