file photo 
मराठवाडा

अतिवृष्टी, कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा

माजलगाव (जि. बीड) - बॅंकेच्या कर्जास कंटाळून माजलगाव तालुक्‍यातील निपाणी टाकळी येथील शेतकरी नारायण अप्पाराव सोळंके (वय 50) यांनी शुक्रवारी (ता. 22) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, तालुक्‍यातील निपाणी टाकळी येथील शेतकरी नारायण सोळंके यांच्याकडे बॅंकेचे कर्ज होते. बॅंकेकडून वसुलीसाठी सतत तगादा असल्याने हा शेतकरी अडचणीत होता. सातत्याने निर्माण होणारा दुष्काळी व अतिवृष्टीमुळे संपूर्ण अर्थचक्र कोलमडले होते.

प्रापंचिक खर्च कसा भागवावा, या विवंचनेतच नारायण सोळंके गुरुवारी (ता. 21) घराबाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी आलेच नाही. सर्वत्र शोधाशोध घेऊनही ते कुठेच सापडले नाहीत. निपाणी टाकळी शिवारातील शेतात बाभळीच्या झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी पुतण्या श्रीकिसन शिवाजी सोळंके यांच्या माहितीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

अप्सरा बनली मंजुळा ! सालबर्डी सिनेमात सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

SCROLL FOR NEXT