sugarcane sugarcane
मराठवाडा

शेतकऱ्यांच्या अडचणींत वाढ! एफआरपीसंबंधी केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता

केंद्र सरकारकडे निती आयोगाने तशी शिफारस केली असून त्यानुसार राज्य शासनाच्या साखर आयुक्तांनी अभ्यास गटाची गुरुवारी नियुक्ती केल्याचे दिसून येत आहे

तानाजी जाधवर

उस्मानाबाद: केंद्र शासनाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेण्याची तयारी केली असून शेतकऱ्यांचं हित न पाहता साखर कारखानदारांच्या बाजूने सरकार उभे राहिल्याचे दुर्देवी चित्र पाहयला मिळत आहे. केंद्र शासनाच्या ऊस नियंत्रण आदेशानुसार गाळप झालेल्या ऊसाची किंमत चौदा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक असते. मात्र आता ही अटच सरकार काढून टाकण्याच्या विचारात आहे.

केंद्र सरकारकडे निती आयोगाने तशी शिफारस केली असून त्यानुसार राज्य शासनाच्या साखर आयुक्तांनी अभ्यास गटाची गुरुवारी नियुक्ती केल्याचे दिसून येत आहे. यामुळे एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) ही संकल्पनाच बंद पडणार आहे. एफआरपीचा मोठा अडसर कारखानदारांच्या समोर होता, तर शेतकऱ्यांसाठी हे सुरक्षा कवच मानले जात होते. त्यालाच बगल देऊन केंद्र सरकारने शेतकरी विरोधी निर्णय घेण्याचा विचार केला आहे.

गाळप झालेल्या ऊसाची रक्कम 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे हे कायद्यात आहे. मात्र आता ही अट शिथील करुन कारखान्यानी शेतकऱ्यांशी करार करुन ही रक्कम दोन ते तीन टप्प्यात देण्याबाबत सुधारणा करण्यात येत आहे. साहजिकच याचा गैरफायदा कारखानदारांना घेता येणे सहज शक्य होणार आहे.पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांची बोळवण करुन पुढील हप्त्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहयला लावायची अशा प्रकारची पध्दत रुढ होण्याची भिती व्यक्त होत आहे. एफआरपीचा कायदा असतानाही त्याची मोडतोड करुन कारखानदार शेतकऱ्यांची रक्कम बुडविण्याचा प्रताप करतात. ही अटच काढून टाकल्यास त्याचा किती गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचा अंदाज येतो.

साखरेच्या दरामध्ये नियंत्रण नसल्याने त्यातील चढ उतारामुळे कारखान्यांना ही रक्कम एका हप्त्यामध्ये देणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. हे मान्य केले तरी सरकारने यावर पर्याय काढण्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

साखरेचा समावेश अत्यावश्यक वस्तुमध्ये करण्यात आलेला आहे. अत्यावश्यक वस्तुच्या कायद्यातुन वगळणे आवश्यक आहे, असे असतानाही सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. साखरेचा दर वाढला तर सामान्य माणुस त्याचे किती सेवन करतो हा मुळ प्रश्न आहे. मात्र तिथेही कंपन्याना ही साखर स्वस्तात मिळावी हा उद्देश सरकारचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT