Rain
Rain 
मराठवाडा

परतीच्या पावसाने शेतकरी सुखावला, सोयाबीन पिक बचावले

राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची आशा भक्कम झाली असून बळीराजा सुखावला आहे. लहान शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन पीक काढून ठेवले असले तरी मोठ्या जमीनदार शेतकऱ्यांची या पावसामुळे तारांबळ उडाली आहे. तालुक्यात यंदा वेळेवर पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन हे पीक वेळेवर काढणीला सुरवात झाली.

यंदा बनावट बियाणे व सोयाबीन बियाणांच्या टंचाईमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी करण्याची वेळ आली होती. त्यातच तालुक्यातील काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक शेतकऱ्यांनी काढून ठेवून गंजी लावले असून सोयाबीन सुरक्षित काढून ठेवल्यामुळे रब्बी हंगामातील पिक पेरणीसाठी सध्या पडत असलेला पाऊस पोषक मानला जात आहे.

उशिरा पेरणी झालेल्या व जमीनदार शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली असून त्यांचे सोयाबीन पीक सध्या रानावर भिजून जात आहे. तालुक्यात शनिवारपासून (ता.दहा) परतीचा पाऊस सुरू झाला असून निलंगा शहरासह केळगाव, खडकउमरगा, बसपूर, शिरोळ-वांजरवाडा, लिंबाळा, औराद शहाजानी, तगरखेडा, कासारशिरशी, हलगरा, आंबुलगा, झरी आदी भागांत जोरदार पाऊस झाला आहे.

या पावसामुळे रब्बी हंगामातील पिक नक्की हाताला लागेल अशी अशा शेतकऱ्यांना लागली असून आणखी असाच मोठा पाऊस झाल्यास पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. तालुक्यातील मांजरा व तेरणा नदीवरील बेरीज पूर्ण क्षमतेने भरले असून मसलगा मध्यम प्रकल्पही पूर्ण भरला आहे. शिवाय लघु प्रकल्पातील पाणी पातळीत वाढ होण्याची गरज आहे.

रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, करडई या पिकाची पेरणी प्रामुख्याने शेतकरी करणार असला तरी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा गंजी लावून ठेवले आहेत. त्यांची रास करण्यासाठी पावसाने अडथळा निर्माण केला असून मोठ्या शेतकऱ्यांचे सोयाबीन राणा वरती असल्यामुळे त्याचे नुकसान होणार आहे.

विजेच्या कडकडाटासह व मेघगर्जनेसह पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. शनिवार व रविवारी (ता.११) तालुक्यातील विविध भागात चांगला पाऊस झाला. जमिनीत ओलावा निर्माण झाल्यामुळे आता रब्बी हंगामासाठी शेतकरी पावसाने उघडीप दिल्यानंतर पेरणीची लगबग करणार असल्याचे दिसत आहे. ढगाळ वातावरण असल्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT