पिंपळगांव रेणूकाई : सोयाबीन उगवली नसल्याने दुबार पेरणीसाठी तयार केलेले शेत.
पिंपळगांव रेणूकाई : सोयाबीन उगवली नसल्याने दुबार पेरणीसाठी तयार केलेले शेत.  
मराठवाडा

सोयाबीनची बोंब, फुटेना कोंब 

महेश गायकवाड

जालना - जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे बोगस असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. पेरणी करून आठवडा झाला तरी बियाणे उगवले नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. 

खरीप हंगामात बोगस व परवाना नसलेल्या बियाणांची विक्रीवर कृषी विभागाच्या पथकाची नजर आहे. भोकरदन तालुक्यात अशा प्रकारे बोगस कपाशी बियाणे विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रचालकाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे; मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन बियाणे बोगस असल्याची तक्रारी येत आहे.

पीककर्ज मिळण्यास अडचणी येत असलेल्या शेतकऱ्यांनी खासगी कर्ज काढून खरीप हंगामात पेरणी केलेली आहे. त्यात बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.

जालना व मंठा तालुक्यात या बियाणाबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. मंठा तालुक्यातील किर्ला या गावातील शेतकरी विकास खंदारे यांनी एका वाणाची गेल्या आठवड्यात पेरणी केली होती. आठ दिवस झाले तरीसुद्धा सोयाबीन उगवले नसल्याची त्यांची तक्रार आहे. 

तात्काळ पंचनामे करा : लोणीकर

बियाणांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावेत, तसेच अशा प्रकारचे बियाणे विक्री केलेल्या विक्रेत्यांसह उत्पादन कंपनीवर गुन्हा दाखल करावेत, अशी सूचना माजीमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 

जमिनीत पुरेसा ओलावा असताना पेरणी केलेली असल्यास पाच ते सहा दिवसांत पीक उगवून येते. जर कमी आले असताना पेरणी केली असल्यास उगवणीबाबत समस्या येऊ शकतात. तरी देखील बियाणाबाबत तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीची पावती घेऊन उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल करावा. तक्रार निवारण समिती याबाबत तपासणी करून अहवाल सादर करेल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. 
- विजय माईनकर, उपसंचालक जालना 

एक हेक्टरवर गेल्या आठवड्यात खासगी कंपनीच्या सोयाबीन बियाणाची पेरणी केली होती. अजूनही ते उगवले नाही. सध्या हे बी मातीत खराब झाले आहे. 
- विकास खंदारे, शेतकरी मंठा 

पुरेशी ओल असताना चार एकरवर एका कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले होते. ते उगवले नाही. पेरणीनंतर सातत्याने पाऊस झाला आहे. 
- गीतेश्‍वर ढेंगळे, 
मानेगाव, ता. जालना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT