file photo
file photo 
मराठवाडा

चारशे दहा ग्रॅमचे शिवभोजन

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : शिवसेनेच्या निवडणूक घोषणापत्रातील बहुचर्चित शिवभोजन योजनेची अंमलबजावणी येत्या (ता. २६) जानेवारीपासून शहरात चार ठिकाणी होत आहे. दुपारी बारा ते दोन या वेळात चारशे दहा ग्रॅम वजनाच्या थाळी लाभार्थींना देण्यात येणार आहेत. या वेळी त्यांचा फोटो व मोबाईल क्रमांक ॲपमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रायोगीक तत्वावर रोज पाचशे थाळ्या
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन देण्याची घोषणा शिवसेनेने निवडणुकीपूर्वी केली होती. यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ही योजना प्रायोगिक तत्वावर आगामी तीन महिन्यांसाठी राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यात पाचशे थाळ्या (जेवण) देण्यात येणार आहे. यासाठी नांदेड जिल्ह्यातील चार ठिकाणे निश्चित करण्यात आली. 

चार ठिकाणी मिळणार शिवभोजन
शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळ, रेल्वेस्थानक (प्लॅटफार्म क्रंमाक चार, गोकूळनगर), शासकीय वैद्यकीय रुग्णालयासमोर (विष्णुपुरी) व नवीन मोंढा येथील एसबीआय बॅंकेसमोर असे चार भोजनालय सुरू करण्यात येणार आहेत. दुपारी बारा ते दोन या वेळात प्रत्येकी सव्वाशे थाळी लाभार्थींना या चार ठिकाणी देण्यात येणार आहेत. या वेळी त्यांचा फोटो व मोबाईल क्रमांक ॲपमध्ये घेण्यात येणार आहे. जेवणासाठी लाभार्थींना दहा रुपये मोजावे लागतील. प्रतिव्यक्ती चाळीस रुपये भोजनालयचालकास शासनाकडून मिळणार आहेत. प्रजासत्ताकदिनी (ता. २६ जानेवारी) पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्याच्या तयारीत प्रशासन आहे. या शिवभोजनाचा आस्वाद गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात असल्यामुळे या ठिकाणी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ताव मारता येणार नाही.

जेवणात काय मिळणार? 
शिवभोजन थाळीत दोन चपाती (प्रत्येकी तीस ग्रॅम), एक वाटी भाजी (शंभर ग्रॅम), एक वाटी वरण (शंभर ग्रॅम) व एक वाटी भात (दीडशे ग्रॅम) असे एकूण चारशे दहा ग्रॅम वजनाचे जेवण गरजू नागरिकांना मिळणार आहे. हे जेवण एका वेळी एकदाच घ्यावे लागेल. जेवणाऱ्या लाभार्थींना जेवणाचे दहा रुपये द्यावे लागणार आहेत. तर भोजनालय चालकाला प्रतिथाळी चाळीस रुपये शासन देणार आहे. दरम्यान, शासनाची शिवभोजन योजना गरिबांसाठी चांगली आहे; पण गरजू लोकांची भूक चारशे दहा ग्रॅमच्या थाळीत कशी भागणार? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

स्वच्छतेकडे राहणार लक्ष 
भोजनालयात एका वेळी पंचवीस नागरिकांना जेवता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या ठिकाणी स्वच्छतेला विशेष महत्त्व देण्याच्या सूचना दिल्या आहेत. स्टेनलेसस्टिलची भांडी वापरावी लागणार आहेत. तसेच या ठिकाणचे जेवण पार्सल करता येणार नसल्याचे शासकीय सूत्राने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT