file photo 
मराठवाडा

हिंगोली : जिल्ह्यातील ढगाळ वातावरणाचा तूर, हरभरा पिकांना धोका 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात मागच्या चार ते पाच दिवसापासून तापमानात घट झाली आहे. कमाल तापमान २५ अंश सेल्सीअसवर आले आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने गहू, तूर तसेच हरभरा पिकांना धोका निर्माण  झाला आहे. 

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे  मागच्या आठवड्यापासून वातावरणात बदल झाला आहे. यावर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांमध्ये अतिवृष्टीने कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटकात सापडले आहेत. यावर्षी रब्बी हंगामातील पिकासाठी मुबलक प्रमाणात पाणी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा पिकांचा पेरा वाढविला आहे. 

खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस हातचे गेले असले तरी रबी हंगामातील पिके साथ देतील, अशी अशा शेतकऱ्यांना आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. ढगाळ वातावरण काही दिवस राहील असे कृषी विभागातर्फे सांगितले जात आहे.  

जिल्ह्यातील  यावर्षी रब्बी हंगामातील गहू पिकाचा पेरा १६ हजार ९९५ हेक्टर, ज्वारी ९ हजार १९९, हरभरा ५५ हजार ५८३, मका १९३, करडई १०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी औषधाची फवारणी करावी व पिकाची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला  कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

SCROLL FOR NEXT