Ujani Ujani
मराठवाडा

शेतात वृक्षारोपण करून केले वडिलांच्या अस्थींचे विसर्जन

रक्षा व अस्थी कुठल्याही नदी किंवा विहिरीच्या पाण्यात न टाकण्याचा निर्णय मुलांनी घेतला

केतन ढवण

उजनी (लातूर): पाणी दूषित होऊ नये व पर्यावरणाला हानी होऊ नये यासाठी येथील जाधव कुटुंबीयांकडून मृत वडिलांवर अग्निसंस्कार केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांची रक्षा व अस्थींचे वृक्षारोपण करत शेतातच विसर्जन करण्यात आले. जाधव कुटुंबीयांनी जुन्या रुढी-परंपरेला फाटा देत पर्यावरणपूरक निर्णय घेतल्याने त्यांच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे.

उजनी (ता. औसा) येथील हॉटेल व्यावसायिक ज्ञानदेव जाधव (वय ७५) यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी (ता.२६) निधन झाले. ६० वर्षापूर्वी त्यांनी येथील सुप्रसिद्ध बासुंदीचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी ते सायकलवर परिसरातील खेड्यापाड्यातून गाई व म्हशीचे गावरान दूध संकलन करायचे. येथील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या बासुंदीची गोडी वाढवण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे.

दरम्यान बुधवारी (ता.२८) ज्ञानदेव जाधव यांचा तिसऱ्या दिवशीचा विधी होता. या दिवशी त्यांची रक्षा व अस्थी कुठल्याही नदी किंवा विहिरीच्या पाण्यात न टाकण्याचा निर्णय त्यांचा मुलगा सुभाष जाधव व नामदेव जाधव यांनी घेतला. या जुन्या परंपरेला नाकारून जाधव कुटुंबीयांनी त्यांच्या शेतात चार आंब्याची झाडे लावून त्यांच्या बुडात रक्षा व अस्थींचे विसर्जन केले.

नदी किंवा विहिरीच्या पाण्यात मृत व्यक्तीचे अस्थी विसर्जन करण्याची प्रथा जवळपास सगळीकडे आहे. असे न करण्याबाबत शासनाकडून ही वारंवार सांगण्यात येते. परंतु अद्यापही लोकांकडून याच्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळते. परिणामी पाणी दूषित होऊन जलप्रदूषण होते. हीच बाब पर्यावरणआचा समतोल बिघडण्यास कारणीभूत ठरते. हे टाळण्यासाठी हा जुना पायंडा मोडीत काढून या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केल्याचे सुभाष जाधव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

द्विशतकवीर Ishan Kishan बाद होताच तिलक वर्माने धावत जाऊन मारली मिठी! प्रतिस्पर्धी कर्णधार असले तरी जिंकली मनं; Photo Viral

Nagpur Crime : सीताबर्डीत टोळीयुद्धातून कुख्यात गुंडाचा खून; चार कुख्यात गुन्हेगारांना अटक

Sugar price: साखर दरवाढीचा खेळ संपला! भाव कधी कमी होणार? सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT