File photo 
मराठवाडा

Video-लॉकडाउन : दिव्यांग झाले सैरभैर, रोजच करावा लागतोय जगण्यासाठीचा संघर्ष

प्रमोद चौधरी

नांदेड : दिव्यांगांनाही इतरांसारखे सन्मानाने जगता यावे म्हणून असंख्य शासकीय योजना आहेत. परंतु त्यांच्यापर्यंत त्या पोचत नसल्याने दररोजच त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. दररोज रेल्वे, बसस्थानकावर तसेच शहरांमध्ये भीक्षा मागून हे दिव्यांग दिवस काढत आहेत. मात्र, हा संघर्ष लॉकडाऊनमुळे अधिक तीव्र झाला असून, मदतीसाठी ते शहरात सैरभैर फिरताना दिसत आहेत.

कोरोना महामारी विषाणुला हरविण्यासाठी अख्खं जग प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. शासन, स्थानिक जिल्हा, पोलिस प्रशासन, आरोग्य विभागातील कर्मचारी रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहे. या विषाणचा फैलाव होवू नये म्हणून देश लॉकडाउन केला आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक वगळून सर्व दुकाने, रेल्वे, बस वाहतूकही बंद आहे. त्यामुळे दररोज भीक्षा मागून दिवस काढणाऱ्या दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यापर्यंत अद्यापही मदत पोहचू शकली नाही, ते मदतीसाठी शहरभर सैरभैर फिरताना दिसत आहे. 

मानवजातीला लागलेला एक शाप म्हणजे शारीरिक, मानसिक विकलांगता ही भावना आता कालबाह्य झाली आहे. २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपंगांना दिव्यांग असे संबोधण्यात यावे असं आवाहन जनतेला केलं; पण फक्त अपंग न म्हणता दिव्यांग शब्दाचा वापर करून त्यांचे सर्व भागेल असं होतं का? असा प्रश्‍न आहे. विशेष म्हणजे शारीरिक आणि मानसिकरित्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींची मनं ही सामान्य व्यक्तींपेक्षा कणखर असतात.  त्यांच्यामध्ये संयम, जिद्द आणि चिकाटी या त्रिसुत्रीतूनच ते आपले आयुष्य जगत असतात. 

दिव्यांग व्यक्ती ही शिक्षण तसेच विविध विषयांमध्ये अनेक कलेमध्ये पारंगत असतात. सामान्यांपेक्षा दिव्यांगांमध्ये सकारात्मक मानसिकताही मोठी असते. विशेष म्हणजे दूरदृष्टीने विचार करणारी बुद्धी देखील त्यांच्याजवळच असते.  प्रत्येक वेळी दिव्यांगांच्या वाट्याला अडचणी या येतच असतात. तरीदेखील मनात जिद्द, संयम ठेवून आपले ध्येय ते गाठतात. मात्र, त्यांना कुचेष्टेचा विषय करून अनेक ठिकाणी डावलण्याचे प्रकार घडतात. 

दिव्यांग, गरिब मागासवर्गीय यांना जोपर्यंत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही तोपर्यंत ते कोणत्याही कामाला 'फिट' होऊच शकणार नाहीत. दिव्यांगांचे प्रश्न शासनापर्यंत पोचतात, पण मंत्रालयातील काही झारीतील शुक्राचर्यांमुळे त्यांचे प्रश्‍न अधिकच गुंतागुंतीचे होत आहेत. परिणामी त्यांना सन्मानाने जगणे तर दूरच आहे; पण त्यांच्या जगण्याचे प्रश्नही दिवसेंदिवस बिकट होत चालले असून लॉकडाउनच्या काळात ते अधिक तीव्रतेने होताना दिसत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT