hingoli photo 
मराठवाडा

लॉकडाउनमध्ये जंगलातील पाणवठे कोरडेच...कुठे वाचा

कृष्णा ऋषी

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : औंढा तालुका डोंगराळ भागात असून येथे जंगलक्षेत्र बऱ्यापैकी आहे. या भागामध्ये वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामध्ये निलगाय रोही, हरण, मोर, वानर असे अनेक प्रकारचे वन्यप्राणी जंगलामध्ये आहेत. परंतु, जंगलामध्ये पाणी उपलब्ध नसल्यामुळे हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे पाण्याच्या शोधात धाव घेत आहेत.

औंढा तालुक्यातील बहुतांश भाग हा जंगल क्षेत्रात मोडतो. औंढा परिसरातही वन विभागाने वृक्षलागवड केल्याने हा परिसर हिरवळीने नटलेला असतो. पावसाळा, हिवाळ्यात तर हा परिसर पाहण्यासारखा असतो. त्यामुळे वन्य प्राण्यांची संख्याही या भागात जास्त आहे. पावसाळा, हिवाळ्यात वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी बऱ्यापैकी उपलब्ध असते. 

पाणवठ्यांचा वन्य प्राण्यांना फायदा

मात्र, उन्हाळ्याची चाहुल लागताच वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. वन्य प्राण्यांची भटकंती थांबावी यासाठी वनविभगागाने ठिकठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांचा वन्य प्राण्यांना फायदा होतो. तसेच मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, सध्या या पाणवठ्यात पाणीच उपलब्ध नसल्याने पाण्याअभावी कोरडे पडले आहेत. 

वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

त्यामुळे वन्य प्राण्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. हरीण, मोर, वानरे मानवी वस्‍तीत पाण्यासाठी धाव घेत आहेत. शेतशिवारातीलदेखील आता पाणी कमी झाले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्‍था आहे ते शेतकरी सिमेंटच्या हौदात पाणी टाकून ठेवतात.

 मानवी वस्तीकडे धाव

 मात्र, अनेकांच्या विहिरी व बोअरवेलची पाणी पातळी खालावल्याने सिमेंटचे हौदही कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. एकीकडे कोरोनाचे संकट असल्यामुळे जनता हैराण आहे, तर याच संकटामुळे वन्य प्राण्यांचे पाणवठे पाण्याने भरले जात नसल्याने हे प्राणीही सैरावैरा धावताना दिसत आहेत. 

वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार

माणसांप्रमाणेच वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा वन्यप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू असून लोक घरात; तर वन्यप्राणी गावात मुक्तसंचार करताना दिसून येत आहेत. तसेच निलगाई, रोही, हरणांचे कळपही भटकंती करीत असल्याचे चित्र आहे.

स्‍वखर्चातून पाणी टाकण्याचे काम सुरू

औंढा नागनाथ तालुक्‍यात असलेल्या जंगलात पंधरा ते सोळा पाणवठे आहेत. सध्या उन्हाळा असल्याने टँकरने स्‍वखर्चातून पाणी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी शासनाकडून कोणताही निधी मिळत नाही. जवळच सिद्धेश्वर धरण असल्याने वन्य प्राण्यांची पाण्याची व्यवस्‍थादेखील होते. उन्हाळ्यात वन्य प्राण्यांच्या पाण्याची व्यवस्‍था कशी होईल, याची काळजी वन विभागाकडून घेतली जाते.
- माधव केंद्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी, औंढा
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : वासनांध खरातच्या 'शिवनिका'च्या उत्पन्नात 7 वर्षांत तब्बल 74 पटींनी वाढ; 'धर्मादाय'कडे सादर केलेल्या लेखापरीक्षणातून गंभीर बाब उघड

काव्या होणार आई पण नंदिनीच्या नशिबी ते सुख नाही ! मालिकेतील नवीन ट्विस्टने प्रेक्षक नाखुष

Isro News : चंद्र अन् अंतराळात भारताची छाप! अंतरिक्ष स्टेशनचे स्वप्न आले जवळ; इस्रोची दोन नवीन स्पेडेक्स मोहिमा जाहीर

बिग बॉसच्या घरात तुला भाऊ मानणारे लग्नाला का नाही आले? सुरज चव्हाणने मारली पलटी; म्हणतो- आता ते लोक...

World Tuberculosis Day 2026: पाठदुखी फक्त पोस्चरमुळे नाही; कधी स्पायनल टीबीही असू शकतो कारण ! 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT