औरंगाबाद - बारावीच्या इंग्रजीच्या पेपरचे टेन्शन गेले. हुश्‍श!!! सुटलो बुवा एकदाचे  अशा आनंदी भावमुद्रेतील विद्यार्थी.
औरंगाबाद - बारावीच्या इंग्रजीच्या पेपरचे टेन्शन गेले. हुश्‍श!!! सुटलो बुवा एकदाचे अशा आनंदी भावमुद्रेतील विद्यार्थी. 
मराठवाडा

कॉप्यांचा ढीग समोर ठेवून लिहिला इंग्रजीचा पेपर!

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून (ता. २१) सुरवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला हर्सूल-सावंगी (जि. औरंगाबाद) येथील परीक्षा केंद्रावर शिक्षकांच्या निगराणीखाली कॉप्यांचा ढीग समोर ठेवून विद्यार्थ्यांनी पेपर लिहिला. अशा पद्धतीने परीक्षेच्या ‘कॉपीमुक्त अभियाना’ला पहिल्याच दिवशी हरताळ फासला. 

सावंगीतील मातोश्री कलावती कनिष्ठ महाविद्यालयात चक्क शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी पेपर सोडविल्याचा प्रकार समोर आला आहे. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने दडपण आल्याचे भाव घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मात्र पेपर संपल्यानंतर सर्व काही ‘आलबेल’ असे भाव दिसत होते. आपल्या पाल्याला कॉप्या पुरविण्यासाठी चक्क पालकांनीच गर्दी केली होती; मात्र जातानाच भरपूर ढिगारा घेऊन गेल्याने ‘पुन्हा येऊ नका’ असे सांगितल्यानंतरही पालक परीक्षा केंद्राबाहेर ठाण मांडून बसले होते. संधी मिळताच आतमध्ये कुंपणावरून उड्या मारून कॉप्या पुरविल्या जात होत्या.

भरारी पथकानेच मारली दांडी 
औरंगाबाद विभागात तब्बल ३२ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असली, तरी या परीक्षा केंद्रावर फिरकण्याची तसदीही भरारी पथकाने घेतली नाही. बैठे पथक केवळ नावाला स्थापन केल्याचे उदाहरण पहिल्याच दिवशी पाहावयास मिळाले. सावंगीच्या परीक्षा केंद्रावर पोलिसांनी मात्र एका जागी बसण्याचीच भूमिका पार पाडली. ‘आम्हाला ताण देऊ नका, हॉलमधील परिस्थिती बाहेर येऊ देऊ नका’, असे शिक्षक-पोलिसांच्या संगनमताचे दर्शन परीक्षा संपेपर्यंत वारंवार पाहायला मिळाले.

सात ‘मुन्नाभाईं’वर पहिल्याच पेपरला कारवाई
औरंगाबाद विभागातून बारावीचा पहिलाच इंग्रजीचा पेपर सोडविताना सात ‘मुन्नाभाई’ गैरप्रकार करताना आढळल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळातर्फे देण्यात आली. गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील एक, तर उर्वरित सहा ‘मुन्नाभाई’ हे बीड जिल्ह्यातील असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले. 

पहिल्या पेपरने गेले ‘टेन्शन’
बारावी बोर्डाची परीक्षा असल्याने जराशी धास्ती, दडपण येते. अशा अवस्थेत पेपर सोडविण्यास आलेले विद्यार्थीही पाहावयास मिळाले; मात्र पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, कसा का जाईना, टेन्शन तर गेले अशी मनमोकळी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

इंग्रजीच्या पेपरचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ असे चार संच होते. यामध्ये साधारण तीस टक्के बदल असतो. बाकी सर्व प्रश्‍नपत्रिका सारख्याच असतात. प्रश्‍नपत्रिका सोपी काढण्यात आली होती. यात सहज लिहून गुण मिळणारे चाळीस टक्के प्रश्‍न होते. कंपोजिशन आणि लेटर रायटिंग या दोन प्रश्‍नांमध्ये सहजासहजी गुण मिळणे सोपे होते. 
- प्रा. देवेंद्र देशमुख, प्राध्यापक, शासकीय कला, विज्ञान महाविद्यालय.

गैरप्रकार गंभीर असून मातोश्री कलावती कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्राच्या संबंधितांना नोटीस पाठविण्यात येणार आहे. संबंधितांची चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 
-वंदना वाहूळ, सहायक सचिव, परीक्षा मंडळ, औरंगाबाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT