file photo
file photo 
मराठवाडा

नांदेड जिल्ह्यात तीन कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

हिमायतनगर तालुक्यातील तिन्ही घटना

नांदेड: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून हिमायतनगर तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या घटनांमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, हिमायतनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका कोरडवाहू तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात एका पाठोपाठ तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. वाईतांडा येथील सचिन सुरेश पवार (वय २१) या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन केले होते, त्यानंतर त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान पाच जुलै रोजी मृत्यू झाला. रुग्णालयाच्या कागदपत्रांवरून हिमायतनगर ठाण्यात पोलिस नाईक एस. एस. वरपडे यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. डोलारी येथील कर्जबाजारी शेतकरी नितीन संजय कदम (वय २२) या तरुण शेतकऱ्यानेही विष प्राशन करून ता. ३० जुलै रोजी आत्महत्या केली. त्याचाही मृत्यू नांदेडच्या शासकीय रुग्णालयात झाला. याच तालुक्यातील भोंडणी येथील विष्णू आंबू जाधव (वय ३२) यानेही विष प्राशन करून ता. एक ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. या प्रकरणी हिमायतनगर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या सोबतच आकाश मारोती पवळे (वय २२) या तरुणाने विष प्राशन करून ता. ३१ जुलै रोजी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT