Osmanabad News 
मराठवाडा

उस्मानाबाद प्रशासन दबावाला बळी पडतेय का, ते कसे, वाचा सविस्तर...!

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरात, तसेच कळंब तालुक्यात एकाच रुग्णाकडून अनेकांना संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही रुग्णांनी माहिती लपविली. त्यामुळे अशा रुग्णांवर कारवाई करण्यास प्रशासनावर दबाव येत असल्याचे बोलले जात आहे. नेमके प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करीत आहे? असा प्रश्‍न सामान्यवर्गातून विचारला जात आहे. 

उस्मानाबाद शहरातील काकानगर भागात एकाच कुटुंबातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला. मुंबई-पुण्याहून जिल्ह्यात अनेक नागरिक आले आहेत. ग्रामीण भागात तर अशा नागरिकांना शाळेत, शेतात क्वारंटाइन करण्यात आले. गावातील नागरिक आणि बाहेरगावांहून आलेले नागरिक यांच्यात संघर्ष उडाले. जिल्ह्यात अनेक नागरिक बाहेरगावाहून आलेले असताना त्यांनी योग्यप्रकारे काळजी घेतली. त्यामुळे त्यांच्यापासून अन्य दुसऱ्यांना संसर्ग झाला नाही. 

म्हणजेच ग्रामीण भागातील नागरिक, बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेले नागरिक, प्रशासनाचे कर्मचारी यांनी योग्यप्रकारे काळजी घेतली. गावातील आशा, अंगणवाडी कार्यकर्ती यांनी वेळोवेळी संपूर्ण माहिती प्रशासनाच्या वरिष्ठांकडे दिली. त्यामुळे ग्रामीण भागात फारसा फैलाव झाला नाही. असे असले तरी काही नागरिकांनी बाहेरून आलेल्यांची माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे अशा अनेक नागरिकांवर पोलिस प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. 

उस्मानाबाद, शिराढोण? 

माहिती दडविणारे; परजिल्ह्यांतून येऊन संसर्ग वाढविणारे मोकाटच 
उस्मानाबाद शहरातील एक नागरिक पुण्याहून शहरात आल्याची माहिती दडविण्यात आली. त्यामुळे अन्य सात-आठ नातेवाईकांना लागण झाली. केवळ एका व्यक्तीने माहिती दडविल्याने असा प्रकार घडला. प्रशासनाकडे योग्यप्रकारे माहिती देण्यास टाळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनालाही मोठी पळापळ करावी लागली. आरोग्य विभागासह अन्य विभागाला याचा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र माहिती दडविलेल्या नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यास प्रशासनाने टाळाटाळ केली.

शिराढोणमध्येही असाच प्रकार घडला. एका व्यक्तीचा सुपारी विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने लॉकडाउनच्या काळातही इतर अनेकांना खाण्याची सुपारी पुरविली. त्यामुळे गावातील इतर अनेकांना कोरोनाची लागण झाली. म्हणजे एकीकडे माहिती दडविली म्हणून गुन्हे दाखल झाले तर दुसरीकडे माहिती दडवून त्यापासून अनेकांना बाधित केले. अशा नागरिकांना मात्र प्रशासनाने सोडून दिले. त्यामुळे प्रशासन कोणाच्या दबावाला बळी पडून काम करीत आहे का? असा प्रश्‍न सामान्यवर्गातून विचारला आहे. 
.................... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT