उस्मानाबाद : काकडी जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
उस्मानाबाद : काकडी जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 
मराठवाडा

बाजारपेठ बंद, शेतीमाल न्यायचा कुठे?

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : लॉकडाऊनचा फटका वेगवेगळ्या घटकांना बसत आहे. बावी (ता. वाशी) येथील सोमनाथ शिंदे यांनी एक एकरामध्ये काकडीचे उत्पन्न घेतले आहे. मात्र, मागणीच नसल्याने काढून ठेवलेली काकडी अक्षरशः आता जनावरांना टाकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. बाजार सुरू नसल्याने व्यापारी माल घेण्यास तयार नसल्यामुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आल्याचे सोमनाथ शिंदे यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभर वाढत असल्याने केंद्र सरकारकडून आता देशामध्ये संचारबंदी लागू केली आहे. साहजिकच बाजारपेठ बंद आहे, त्यामुळे आता शेतीमाल कुठे न्यायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. सोमनाथ शिंदे यांनी गेल्या काही महिन्यांपासून अनेक अडचणींना सामोरे जात एका एकरामध्ये काकडीचे पीक घेतले होते. सध्या काकड्या येत असतानाच कोरोनामुळे संचारबंदी असल्याने व्यापाऱ्यांकडून मागणी घटली आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दररोज साधारण एक हजार किलो म्हणजे एक टन काकडीचे उत्पादन निघत आहे. साधारण दहा रुपये किलो असा दर गृहीत धरला तरी दिवसाकाठी दहा हजार रुपयांचे नुकसान होत आहे. अशीच परिस्थिती गावामध्ये अन्य शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे. वांगी, शेवगा यासह विविध पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असतानाही बाजारपेठ बंद बसल्याने नुकसान सहन करावे लागत आहे. एवढे महिने घेतलेली मेहनत केलेला खर्च हे सगळेच मातीत गेल्याची प्रतिक्रिया देताना त्यांनी आपली हतबलता बोलून दाखविली.

शासनाने बाजारपेठेसाठी काही सुविधा निर्माण केल्या असल्या, तरी व्यापाऱ्यांना फोन केल्यानंतर आता मालाची आवश्यकता नसल्याचे सांगितले जात आहे. साहजिकच माल घेऊन जाणार तरी कुठे, असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे नाइलाजाने काकडी जनावरांना टाकून द्यावी लागत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT