mahavitaran mahavitaran
मराठवाडा

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांचे लाखोंचे नुकसान

गेल्या अनेक वर्षांपासून डिकसळ मूळ गावात विजेचा लपंडाव सुरु आहे

दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद): तालुक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या डिकसळ गावात गेल्या द्नेक वर्षांपासून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. मंगळवारी (ता.१५) हाय होलटेजमुळे एका रात्रीत ४२ टीव्ही २६ फ्रीज ४९ फॅन, कुलर, मोबाईल, चार्जर व पाचशे पेक्षा अधिक बल्ब मधून धूर निघाला आहे. त्यामुळे डिकसळ येथील नागरिकांचे १८ लाख रुपयापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. एवढे घडून देखील असलेल्या महावितरण प्रशासनला अजूनही जाग आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गावकऱ्यांच्या घरात धूर काढणाऱ्या महावितरणने झालेल्या नुकसाणीची भरपाई द्यावी अन्यथा प्रशासनाविरुद्ध गावकरी आंदोलन करण्याच्या तयारीला लागले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून डिकसळ मूळ गावात विजेचा लपंडाव सुरु आहे. एकाच डीपीवर सगळ्या गावचा कारभार लादल्यामुळे चिमणीच्या उजेडासारखा उजेड पडत आहे. सहा महिन्यात दहा वेळा येथील ट्रांसफार्मर जळाला आहे. पावसाचा थेंब किंवा वाऱ्याने पान जरी हालले तरी वीज गुल होत आहे. याबाबत कार्यालायाकडे सातत्याने ग्रामस्थांनी पाठपुरावा केला तरीही मुजोर प्रशासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी महावितरण विरोधात जोरदार रणशिंग फुंकत आंदोलन उभा करायला सुरुवात केली आहे.

गावात वीज कमी दाबाने वीज पुरवठा होणे, वारंवार लाईट जाणे यासारख्या शेकडो समस्यांना गावकरी तोंड देत आहेत. त्यातच मंगळवारी रात्री अचानक अधिक दाबाने विद्युत प्रवाहामूळे एका क्षणात  लाखो रुपयांचे गावकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच गावात लाईट नसल्यामुळे गावात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तारा डोक्याला लागल्यामुळे आतापर्यंत तीन जणांचा बळी गेला आहे. यासारख्या शेकडो समस्यांनी अडचणीत सापडलेल्या गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला जाग तरी कधी येणार असा सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.

निष्क्रिय अधिकारी आणि मुजोर खाजगी गुत्तेदारी 

सर्वसामान्य माणसांच्या जीवावर उठलेल्या महावितरण कार्यालयात सध्या सावळा गोंधळ सुरु आहे. शेकडो समस्यांनी मेटाकुटीला आलेल्या ग्रामस्थांना शुल्लक कामासाठीही शेकडो चकरा माराव्या लागतात या कार्यालयात काम करणारे अनेक कर्मचारी दुसऱ्याच्या नावाने राजरोजसपणे आपली खाजगी ठेकेदारी जोरात चालवतात. त्यामुळे योग्य ते प्रमाणात महावितरणची कामे होताना दिसत नाहीत.

खासदार व आमदार यांच्या आदेशालाही केराजी टोपली-

शिवसेनेचे खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी अनेकवेळा डिकसळ गावच्या वीजप्रश्नावरून  महावितरणच्या अधिकाऱ्यांना झापझाप झापले होते. त्यावर अधिकाऱ्यांनी आठ दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. अद्यापही विजेचा प्रश्न मार्गी लागला नाही. खासदार व आमदार यांच्या  आदेशालाही न जुमानण्याचे काम या निर्धास्त प्रशासनाने केले आहे. त्यामुळे आता तक्रार तरी करायची कोणाकडे असा प्रश्न पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election साठी भाजप-शिवसेना एकत्र, पण राष्ट्रवादीचा उल्लेख नाही, जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला!

School Ragging Case : सरकारी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या डोक्याचे केस, भुवया ब्लेडने कापल्या; रॅगिंगच्या धक्कादायक प्रकाराने पालघर हादरले

'लाज कशी वाटत नाही' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत चाहत्यांनी केलं गैरवर्तन, धक्काबुक्कीला वैतागून जोरात ओरडली, viral Video

ICICI Prudential AMC IPO : GMP मध्ये मोठी उसळी! ₹2535 वर उद्या लिस्टिंगची शक्यता; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेडच्या मुखेडमध्ये जाहीर सभेसाठी उपस्थित; नगरपालिकेच्या प्रचारासाठी सभा

SCROLL FOR NEXT