जालना : जिल्ह्यात तीन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागत आहे. शुक्रवारी रात्री जिल्ह्यात ठिकठिकाणी रिमझिम पाऊस झाला. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत परतूर वगळता सात तालुक्यात १०.८६ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. यात भोकरदन तालुक्यातील राजूर मंडळात ८० मिली मिटर पाऊस झाला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याभरात पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिप पिकांच्या पेरणीला वेग आला आहे. दोन दिवसात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड झाली. त्यांनतर शुक्रवारी (ता.१२) रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात १०.८६ मिली मिटर पावसाची नोंद झाली.
यात भोकरदन तालुक्यात मुसळधार पाऊस होऊन सर्वाधिक ३५ मिली मिटर पाऊस झाली. तर राजूर मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जालना तालुक्यात पाच मिली मिटर, बदनापुरमध्ये १८.८०, जाफराबादमध्ये २२.२०, मंठा तालुक्यात २.२५, अंबड तालुक्यात २.५७ व घनसावंगी तालुक्यात ०.७१ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षीक सरासरी ६६३.२० मिलीमिटर असून एक जूनपासून आतापर्यंत ८३.९६ पाऊस झाला आहे.
मुसळधार पावसाने नद्या नाल्या वाहल्या ओसंडून
भोकरदन तालुक्यात शुक्रवारी रात्री उशिरा काही भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील नद्या, नाल्यांना पूर आला आहे. काही ठिाकाणी नदीचे पाणी शेतात घुसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार संतोष दानवे, तहसीलदार संतोष गोरड यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे. तसेच मुसळधार पावसानंतर जुई धरण १६ फूट भरले असून सायंकाळ पर्यंत धरण शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.