file photo
file photo 
मराठवाडा

Video : खरिपाची पेरणी करताना ‘या’ गोष्टीकडे लक्ष द्याच

कैलास चव्हाण

परभणी : खरीप हंगाम जवळ आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी जोरदारपणे सुरू केली आहे. मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. शेतकरी खत, बियाणे खरेदी करू लागले आहेत. पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या जमिनीत कायम पेरावे, बियाणे कोणते निवडावे याबद्दल येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक तथा कृषी विद्यावेत्ता डॉ. उद्धवराव आळसे यांच्याशी ‘सकाळ’ने साधलेला संवाद.

मराठवाड्यात खरिपाची पेरणीची तयारी सुरू झाली आहे. या भागातील जमिनीचे विविध प्रकार अढळून येतात. हलकी, मध्यम आणि भारी अशा तीन प्रकारांत मराठवाड्यातील जमीन विभागली आहे. काही भागात अतिशय हलका, काही भागात मध्यम स्वरूपाचा आणि काही ठिकाणी अधिक प्रजन्यमान असते. त्यानुसार पिकांची निवड करावी लागते. जमिनीच्या पोतानुसार पिकांची निवड करावी, असा सल्ला डॉ. आळसे यांनी दिला आहे.


अशी निवडा पीक पद्धती
कमी प्रजन्यमान (५५० ते ७५० मिमी) वार्षिक प्रजन्यमान असलेल्या हलक्या जमिनीत बाजरी, तीळ, कारळ, एरंडी, हुलगी, मटकी, अंतरपिकांचा अंतर्भाव करावा. मध्यम जमिनीत तूर + ज्वारी, तूर+ सोयाबीन आणि भारी जमिनीत कपाशी, मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घ्यावीत. निश्चित पावसाच्या प्रदेशातील (७५० ते ९५० मिमी) हलक्या जमिनीत सूर्यफूल, संकरित ज्वारी, बाजरी, मध्यम स्वरूपाच्या जमिनीत कमी कालावधीत येणारे सोयाबीन, तूर, संकरित ज्वारी ही पिके, भारी जमिनीत कापूस, सोयाबीन, तूर ही दीर्घ कालावधीची आणि दुबार पिके घ्यावीत. जास्त पाऊस (९५० ते १२५० मिलिमीटर) पडणाऱ्या हलक्या प्रदेशात  भातासारखी, मध्यम सोयाबीन, ज्वारी, भारी जमिनीत सर्वच प्रकाराची पिके घेता येतील. काळ्याभोर आणि मध्यम जमिनीत कपाशी + तूर या  आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, तसेच सोयाबीन + तूर  हेदेखील आंतरपीक घेता येते.  कपाशीमध्ये तूर (६:१ किंवा १०:२) सोयाबीन (१:१) किंवा उडीद (१:१) याप्रमाणे आंतरपीक घ्यावीत, सोयाबीन पिकामध्ये एमएयूएस- ७१, एमएयूएस- १५८, एमएयूएस-१६२ अशा वाणांची निवड करावी, तूर पिकामध्ये भारी जमीन (१ ते २ सिंचन असल्यास) बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३, बीडीएन ७११, बीडीएन ७०८ या वाणांची निवड करावी, जमिनीची मशागत व पेरणी उताराला आडवी करावी. पावसाचे अधिकाधिक पाणी जमिनीत मुरून त्याचा पिकांना लाभ होईल,  सोयाबीनसारख्या पिकामध्ये घरचे बियाणे वापरू शकतो. पेरणी केलेल्या प्रमाणित बियाणापासून तयार होणारे बियाणे दोन ते तीन वर्षे पेरणीसाठी वापरता येते. घरच्या घरी उगवण क्षमता तपासावी (कमीत कमी ७० टक्के असावी).


पावसाच्या आगमनानुसार ही पिके घ्यावी
दरवर्षी मान्सूनचे आगमनाच्या वेळा बदलत असतात. त्यामुळे पेरणीही लांबते अशा वेळी पीक पद्धतीमध्ये बदल करावा लागते. जर पावसाचे आगमन वेळेवर (१५ ते ३० जून) किंवा ( ७ते ३० जून) दरम्यान झाल्यास  मूग, उडीद, तूर, सोयाबीन, कपाशी, मका, खरीप ज्वारी, पेरसाळ, बाजरी, खरीप भुईमूग व संबंधित आंतरपीक पद्धती घेता येतील. विशेष करून मूग, उडीद, भुईमूग या  पिकांची पेरणी ३० जूनपर्यंत होणे आवश्यक आहे. उशिरात उशिरा सात जुलैपर्यंत या पिकांची पेरणी करता येते. मान्सून ३० जूनपर्यंत किंवा सात जुलैपर्यंत आला नाही तर मात्र काही पिकांमध्ये बदल करावे लागतील. आठ जुलैपर्यंत पाऊस लांबला तर मूग, उडीद, भुईमूग पिकांऐवजी कापूस, सोयाबीन, तूर, संकरित बाजरी, तीळ, सूर्यफूल, संकरित ज्वारी या पिकांना प्राधान्य द्यावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT