hingoli photo 
मराठवाडा

केळी पिकाला लॉकडाउननंतर उन्हाचा फटका

मुजाहेद सिद्दीकी

वारंगा फाटा (जि. हिंगोली) : जिल्ह्यात काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ होत असून तापमान ४० ते ४४ अंशांवर राहात आहे. त्यामुळे नागरिक घामाघूम होत असून याचा फटका पिकांनाही बसत आहे. वारंगा फाटा (ता. कळमनुरी) परिसरातील केळी पिकातील ओलावा कमी होत असल्याने पाने जळून जात असून उत्पादनात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

कळमनुरी तालुक्‍यातील वारंगा फाटा परिसरातून इसापूर धरणाचा कालवा जातो. या कालव्यावर हजारो हेक्‍टर जमीन सिंचनाखाली आली आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी ऊस, केळी, हळद ही नगदी पिके घेतात. तसेच उन्हाळ्यातदेखील कालव्याला पाणी सोडल्यास भुईमुगाचे पीक घेतले जाते.

मोठ्या प्रमाणात केळीची लागवड 

 वारंगा फाटा गावासह डोंगरकडा, सुकळीवीर, जामगव्हाण, जवळा पांचाळ, दिग्रस बुद्रुक, दांडेगाव, हिवरा, वरुड, रेडगाव, वडगाव या गावांत मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. उत्तम नगदी पीक म्हणून या बारमाही पिकाकडे शेतकरी पाहतात. 

तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान

मागील वर्षी केळीला चांगल्याप्रकारे भाव मिळाल्यामुळे या वर्षीदेखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली आहे. भाव चांगला मिळणार या आशेवर केळी संगोपनावर मोठा खर्चही करण्यात आला आहे. मात्र, तापमानात झालेली वाढ केळी पिकाच्या मुळावर आली आहे. कधी नव्हे ते वाढलेल्या तापमानामुळे केळी पिकाचे नुकसान होत आहे. 

२० ते ३० टक्के घट होण्याची भीती

दरवर्षी मे महिन्यातील तापमान ३८ ते ४० अंशांवर असते. या वर्षी मात्र ते ४५ अंशांपर्यंत गेले आहे. त्यामुळे केळी पीक चांगलेच अडचणीत सापडले असून पाने जळून जात आहेत. असेच तापमान राहिल्यास उत्पादनात २० ते ३० टक्के घट होण्याची भीती उत्‍पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.

२० ते ३० टक्के घट होण्याची भीती

केळीचे पीक उन्हाला हळवे असून वाढलेल्या तापमानामुळे त्याचे विपरित जाणवत आहेत. मागील वर्षी एप्रिल ते मे महिन्यात केळीला चौदाशे ते आठराशे रुपये क्विंटलचा दर मिळत होता. या वर्षी लॉकडाउनमुळे तो २५० ते पाचशे रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे. यात लागवड खर्च निघणेही अवघड झाले आहे. त्यात तापमानात वाढ होत असल्याने पिकावर परिणाम होत आहे.
-दिगंबर गोरे, केळी उत्‍पादक

पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

औंढा नागनाथ : खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी लॉकडाउनच्या काळातील मरगळ झटकत पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरवात केली आहे. बैलजोडी व ट्रॅक्‍टरच्या मदतीने ही कामे केली जात आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने सकाळीच शेतकरी शेतातील कामे करीत आहेत. या वर्षी सोयाबीनची पेरणी अधिक केली जाणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forest Department Demolition : आजारी आई, पत्नीवर शस्त्रक्रिया अन् दिव्यांग मुलगा...; कोल्हापुरात वनविभागाच्या जेसीबीने तीन कुटुंबांचे संसार मोडले, असं घडलं काय?

NCAP Rating : नवीन फीचर्स, 25 kmpl मायलेज अन् 5 स्टार सेफ्टी; Maruti Brezza का ठरतेय बेस्ट SUV?

Latest Marathi News Live Update : धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत चर्चा नाही; राहुल गांधी यांचा आक्रमक पवित्रा

Mumbai Police: पोलिसाकडून महिला आंदोलकासोबत गैरवर्तन? विरोधकांचा आरोप, व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांचे स्पष्टीकरण

Ratnagiri Farmer Loan Waiver : रत्नागिरीतील 7,333 शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती! पहिली यादी लवकरच प्रसिद्ध; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT