Vela Amavasya esakal
मराठवाडा

उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यात 'येळवस' उत्साहात साजरी

वेळ अमावास्यानिमित्त (येळवस) उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेत-शिवारात नागरिकांची मोठी गर्दी होती.

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : वेळ अमावास्यानिमित्त (येळवस) रविवारी (ता.दोन) उस्मानाबाद, लातूर सोलापूर, बीड जिल्ह्यातील शेत शिवारात नागरिकांची मोठी गर्दी होती. शेतकरी कुटुंबिय मोठ्या उत्साहात शेतातील पाच पांडवाची विधिवत पुजा करून अन्नधान्य बरकतीची अपेक्षा व्यक्त केली. दरम्यान मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. नैसर्गिक संकट कितीही आले तरी काळ्या आईची (लक्ष्मीची) पुजा करण्याच्या परंपरेत शेतकऱ्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. नवीन वर्षातला पहिल्या रविवारचा योग वेळ अमावस्येला आल्याने शेतकरी कुटुंबियात मोठा उत्साह दिसतोय. भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्त्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो. हजारो कुटुंबाचा शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेती कसणारा वर्गही मोठा आहे. शेतीला 'धनलक्ष्मी' मानणारा शेतकरी बांधव शेतातील उत्पन्नाची समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करत  काळ्याआईची मनोभावे विधीवत पुजा करून  वेळ अमावस्या साजरा करतो. बहुतांश नागरिकांचा रविवारचा दिवस शेत शिवारात गेला. (Vela Amavasya Celebrate In Osmanabad, Latur And Beed)

विधिवत पुजा अन् उत्साह

उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटक राज्यातील गुलबर्गा, बिदर जिल्ह्यात ही प्रथा सुरू झाली तेथे येळ अमावस्या असे म्हटले जाते. त्यामुळे वेळ अमावस्येला येळवस हाही शब्दप्रयोग आपल्याकडे आला. सणाच्या आदल्या दिवशी शेतातील झाडाच्या बुंद्याला कडब्याची इरली कोप तयार आली होती. कोपीत पाच पांडव्याला गेरू, चुन्याची रंगोटी केली गेली. रविवार पहाटे अंबिलाचं बिदंग डोक्यावर घेऊन शेतीकडे जात होते. कारभारी - कारभारीनं जोडीनं दिवे पाजळत विधिवत पद्धतीने पाच पांडवाची पुजा केली. त्यानंतर " हरभल्या भगतरा जो हरभल्या ... चा जयघोष करत ज्वारी, हरभऱ्याच्या पिकात अंबिल शिंपडले गेले.

वन भोजनाचा घेतला आस्वाद

शिवारात ओलीता खालील पिके बहरात आलेे असले तरी पिकांवरील कीड, अळीचे विघ्न दुर करण्याचा खटापोट करावा लागतोय. नैसर्गिक संकटाचे कितीही धुके आले तरी शेतकरी कुटुंबासाठी वेळ अमावस्याचा सण एक पर्वणीच असते. बैलगाडीतुन सहकुटुंब शेताकडे जाण्याची मजा औरच असते. अजुनही बरेच शेतकरी कुटुंबिय बैलगाडीतुन शेताकडे जात होते. तर बहुतांश जण दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टरमधुनही शेताकडे जात होते. सजगुऱ्याचे (बाजरी) उंडे, कानवले, बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी, पालेभाज्या, वटाणा, हरभऱ्याचे हिरवे दाणे, बेसन यापासुन बनविलेली भाजी (भज्जी), वांगे, कांद्याची पात व हिरव्या मिरच्यापासुन तयार केलेले भरीत, गव्हाची खीर, कोंदीच्या गोड पोळ्या, आंबट भात (खिचडा) आदी खाद्य पदार्थाची मेजवाणी घेत शेतकरी बांधव कुटुंबासह, मित्रमंडळीनी वनभोजनाचा आस्वाद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT