aundha nagnath panitanchai 
मराठवाडा

हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत

सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ( जि. हिंगोली) : तालुक्यातील बहुतांश गावात पाणीटंचाई जाणवत असून गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत. तालुक्‍यातील तीन गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. काळापाणी तांडा येथे तर भिषण पाणीटंचाई जाणवत असून पाण्याचा टँकर येतात पाणी घेण्यासाठी झुबंड उडत आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा कामात व्यस्त आहे. इकडे अनेक गावातील गावकऱ्यांना घागरभर पाण्यासाठी लहान मुले व महिलांनासह चौफेर उन्हात पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाई जाणवत असलेल्या गावांत प्रशासनातर्फे टॅंकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी लोकसंख्येंच्या तुलनेत हे पाणी कमी पडत आहे. 

चार तांड्यावर टँकरद्वारे पाणी पुरवठा

सध्या तालुक्‍यातील देवाळा, तामटी तांडा, जलालदाभा, पाझरतांडा, देवाळा तर्फे लाख, सावरखेडा, भोसी, जांभळी तांडा या गावांत विहीरीचे अधिग्रहन केले आहे. दोन गावांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. तसेच काळापाणी तांडा, रेवनसिंग तांडा, सेवादास तांडा व संघनाईक तांडा या चार तांड्यावर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. 

पाणी घेण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड

दोन गावे प्रस्तावित आहेत. काही गावांचे प्रस्ताव आल्यास स्थळ पंचनामा करून २४ तासांच्या आत प्रस्तावाला मंजुरी देण्यात येत असल्याची माहिती गटविकास अधिकारी जगदीश साहू यांनी दिली. दरम्यान, या गावांत दररोज टॅंकरची एकच फेरी येत असल्याने गावात टँकर येतात पाणी घेण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड उडत आहे. त्यामुळे सोशल डिस्‍टन्सिंगचा फज्जा उडत आहे. मिळेल त्‍या पध्दतीने टँकरमधील पाणी घेण्याचा प्रयत्न गावकरी करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कोरोनापेक्षा मोठे संकट

सध्या कोरोनाच्या संकटाने सर्वच जण स्वत:ची काळजी घेत आहेत. लॉकडाउनच्या काळात खेडेगावातही ग्रामस्थ बाहेर पडत नव्हते. जीवनावश्यक वस्तू नसल्या तरी कोरोनाच्या भीतीने घराबाहेर जाणे टाळले. आता पाणीटंचाई निर्माण झाल्याने कोरोनाच्या संकटातही घराबाहेर पडावे लागत आहे. टॅंकर आल्यानंतर पाणी घेण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडत आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे माहित असूनही पाण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.

  येथे क्लिक करा - अबब... ८४ प्रकल्प गाळमुक्त


एकवेळेस पाण्याचे टँकर 

काळापाणी तांडा गावात तिनशे ते साडेतिनशे लोकसंख्या आहे. ३५ घरे आहेत. उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाई असते. सकाळी साडेआठ ते नऊ वाजता एकवेळेस पाण्याचे टँकर येते. टँकर आल्यावर मात्र पाणी घेण्यासाठी गर्दी होत आहे.
-रोहिदास राठोड, ग्रामस्‍थ


प्रस्तावाला चोवीस तासात मंजुरी

तालुक्‍यातील चार गावांत सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. नऊ गावांत विहीरीचे अधिग्रहन केले आहे. टँकरसाठी प्रस्‍ताव आल्यास स्‍थळ पाहणी करून चोवीस तासात त्‍याला मंजुरी दिली जाणार आहे.
-जगदीश साहू, गटविकास अधिकारी


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT