mumbai police 
मुंबई

बापरे! मुंबईत दोन दिवसात तब्बल 'इतक्या' पोलिसांना कोरोनाची लागण; आज आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई:  मुंबईत शुक्रवारी आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील मृत पोलिसांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. दुर्दैवाने गेल्या दोन दिवसात 102 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

मृत 55 वर्षीय पोलिस हवालदार ताडदेव वाहतुक विभागात कार्यरत होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. एल्फिन्स्टन येथील रहिवासी असलेले पोलिस हवालदार परळ येथील केईएम रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या श्वास घायला त्रास होत असल्यामुळे 9 जूनला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी त्यांना कोणताही गंभीर आजार नव्हता.

त्यांना कोरोना कोणाच्या संपर्कात आल्यामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या संपर्कातील इतर पोलिसांना घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. गेल्या सात दिवासात 9 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या दोन दिवसात 102 पोलिसांना  कोरोनाची बाधा झाली आहे. 

मुंबईत आतापर्यंत 2349 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. पण कोरोनावर मात करणा-या पोलिसांचा आकडा मोठा आहे. सुमारे 65 टक्के पोलिसांनी कोरोनावर मात केली आहेत. त्यातील अनेक पुन्हा सेवेत रूजू झाले आहेत. तर उर्वरीत नियमानुसार घरीच क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत पोलिसांसाठी चार कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय इतर प्रतिबंधात्मक साहित्य व औषधांचे वाटपही पोलिसांना करण्यात आले.

102 police are corona positive in last 2 days in mumbai 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT