ठाणे : कोरोनामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला होता. परंतु आता मालमत्ता करापाठोपाठ पालिकेच्या पाणी विभागानेही पाणीपटटीची वसुली जोमाने सुरु केली असल्याची माहिती समोर आली आहे. मिशन बिगेन अंतर्गत जूनपासून लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता देण्यास सरकारने सुरु वात केली याचा फायदा पालिकेलाही झाला. त्यानुसार अवघ्या दोन महिन्यात 38 कोटी 83 लाख 13 हजार 482 रुपयांची वसुली झाली आहे.
कोरोनाच्या साथीमुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला होता. परंतु अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने पालिकेच्या मालमत्ता करात भर पडण्यास सुरवात झाली आहे. एकीकडे मालमत्ता कर आणि तीन महिन्यांचा पाणी कर माफ करण्याची मागणी केली जात असताना दुसरीकडे ठाणेकरांनी मात्र या दोनही करांची रक्कम पालिकेला अदा करण्यास सुरवात केली आहे. दरम्यान यावर्षीचे आर्थिक वर्ष संपायला काही दिवस राहिले असताना देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तेव्हापासून बहुतांशी आर्थिक व्यवहार पूर्णपणो ठप्प झाले. दोन महिन्यानंतर जूनपासून पालिकेच्या मालमत्ता कराची वसुली सुरु झाली. तर जुलै अखेरपासून पाणीबिलाची वसुली सुरू आहे.
गेल्या वर्षी 1 एप्रिल ते 29 सप्टेंबर दरम्यान 29 कोटी लाख वसूल झाले होते. मात्र यंदा कोरोना काळात अवघ्या दोन महिन्यात 38 कोटी 83 लाखाची वसुली झाली आहे. दरम्यान 29 सप्टेंबर या एकाच दिवसात 1 कोटी 60 लाख रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. या वर्षी अवघ्या दोन महिन्यात पाणीपट्टीची सर्वात जास्त वसुली वर्तकनगर प्रभागात 5 कोटी 84 लाख, उथळसर 4 कोटी 18 लाख, ओवळा 4 कोटी 58 लाख, चितळसर मानपाडा 3 कोटी 94 लाख, नौपाडा 3 कोटी 8 लाख वसुली झाली असून, येत्या काही दिवसात यात मोठी भर पडेल. असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
---------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.