मुंबई

तब्बल 425 वर्षाची परंपरा होणार खंडीत! विदर्भातून पंढरपूरला जाणाऱ्या रुक्मिणी माऊलीच्या पालखीला परवानगी नाही

सकाळ वृत्तसेवा


मुंबई ; गेल्या 425 वर्षापासून रुख्मिणी मातेचे माहेरघर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर येथून आषाढी एकादशीला पंढरपूरला पालखी जाते. महाराष्ट्रातील जुन्या परंपरांपैकी ही एक आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ 5 पालख्यांना परवानगी दिली आहे. यामध्ये रुक्मीनी पालखीचा समावेश नाही. त्यामुळे 425 वर्षाची पालखीची पंरपरा यावेळी पहिल्यांदा खंडीत होणार आहे. त्यामुळे वारकरी नाराज आहेत.

कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन पंढरपूर येथे मानाच्या ५ पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. रुख्मिणी मातेच्या माहेरहुन दरवर्षी साडीचोळी, नैवद्य चढविण्यात येतो .मात्र यावर्षी विदर्भातील पालख्यांना परवानगी नसल्याने  विठ्ठल रुख्मिणी संस्थानाने नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भातील या सर्वात जुन्या पालखीला विशेष परवानगी देण्याची विठ्ठल रुख्मिणी संस्थानाने प्रशासनाने मागणी केली आहे. 26 मेला पालखीची विधीवत पूजा केली आहे. आता पालखीचे प्रस्थान होण्यासाठी वाट पाहत असल्याचे संस्थान सदस्यांनी म्हटले आहे.

परवानगी दिल्यास सोशल डिस्टसिंगच्या नियमांचं पालन करून आम्ही पालखी काढण्यात काढू असं विश्वस्तांनी सांगितल आहे. यासंदर्भात सोलापूर जिल्हाचे पालकमंत्र्यांशी या संदर्भात बोलणी सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आषाढी एकादशीसाठी दरवर्षी विदर्भातून अनेक पालख्या पंढरपूर रवाना होतात. मात्र यावेळी एकाही पालखीला परवानगी देण्यात आली नाही. 

यावेळी मानाच्या 5 पालखीमध्ये विदर्भातील एकाही पालखीचा समावेश या वेळी केला नाही.  हा विदर्भावरचा अन्याय आहे. विदर्भातील पाच पालख्यांना, 25 वारकऱ्यासह प्रवासाला मंजूरी द्यावी. अन्यथा आमच्या वाहनाने आम्ही पंढरपूरला जाऊ. 
गणेश शेटे 
विश्वस्त वारकरी, कौड्यनपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Jain Video : राजकारणातून संन्यास घेतल्यानंतर सुरेश जैन यांचा भाजपला पाठिंबा; म्हणाले...

Devendra Fadnavis : मोदी गरिबांचे मसिहा, काँग्रेसने स्वतःची गरिबी हटविली; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Afghanistan Floods : अफगाणिस्तानमध्ये महापूर, ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; अनेक घरं गेली वाहून

PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

Shirpur Jain News : पार्श्वनाथच्या मंदिरात पुन्हा तुंबळ हाणामारी, दोन जण जखमी

SCROLL FOR NEXT