मुंबई

संजय राऊत, शरद पवार यांच्या फोनचं टॅपिंग ? ठाकरे सरकारचे चौकशीचे आदेश..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये ठाकरे सरकारने अत्यंत महत्त्वाच्या चौकशीचे आदेश दिलेत. हे आदेश आहेत महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या  काळात ज्या नेत्यांचे फोन टॅप केले गेलेत त्यांची ठाकरे सरकार चौकशी करणार आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या वतीने याची चौकशी केली जाणार आहे. काँग्रेसनेते दिगविजय सिंह यांच्या तक्रारीनंतर आता महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारने या चौकशीचे आदेश दिलेत

भाजप सरकारच्या काळात ज्यांनी विरोधात भूमिका मांडली, जे विरोधात बोलत होते याचसोबत भीमा कोरेगाववेळी देखील फोन टॅपिंग केलं गेल्याचं बोललं जात होतं. पेगॅसिस या स्पायवेअरचा वापर करत हे फोन टॅपिंग केल्याचा आरोप दिगविजय सिंह यांनी केला होता. एक अधिकारी थेट इस्राईलला जाऊन हे स्पायवेअर घेऊन आल्याचं बोललं जातंय. 

एका मराठी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार ही बातमी समोर येतेय. यामध्ये आता महाराष्ट्र सायबर सेलच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे असं सांगण्यात आलंय. महाराष्ट्राच्या गृहखात्याने तसे आदेश दिल्याचं समजतंय. यामध्ये संजय राऊत, शरद पवार, उद्धव ठाकरे याचसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक नेत्यांवर नजर ठेवली जात होती, फोन टॅप केले जात होते असे आरोप केले जातायत आणि म्हणूनच आता याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

after digvijay singhs complain maharashtra vikas aaghadi to investigate in phone tapping during bjp government  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमारकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT