मुंबई

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सर्व महिलांना लोकल ट्रेनमध्ये प्रवासास परवानगी; ठाकरे सरकारचा महिलांना दिलासा

तुषार सोनवणे

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील चाकमान्यासाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्यात यावी याबाबत मागणी करण्यात येत होती. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकार टप्प्याटप्प्याने हा निर्णय घेण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे महामुंबईतील सर्व महिलांना नवरात्रच्या पार्श्वभूमीवर लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली आहे.

ठाकरे सरकाने मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनेक व्यवहार सुरू झाले आहेत. कार्यालये सुरू झाली आहेत. परंतु मुंबईतील कार्यालयांपर्यंत पोहचण्यासाठी उपनगरीय लोकल सेवा महत्वाची भूमिका बजावते. लोकल प्रवासास मुभा नसल्याने खासगी सेवेतील महिला कर्मचाऱ्यांचे कार्यालयात पोहचण्यास हाल होत होते. त्यामुळे ठाकरे सरकारने महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. महिलांना लोकल प्रवासासाठी क्यूआर कोडचीही गरज नसणार आहे. परंतु त्यासाठी सरकारने काही नियमावली ठरवून दिली आहे. 

महिलांना लोकल प्रवासाची मुभा दिली खरी परंतु त्यासाठी सरकारने वेळा ठरवून दिल्या आहेत. सकाळी 11 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 7 ते शेवटच्या लोकलपर्यंत महिलांना प्रवासास परवानगी असणार आहे. यामुळे सकाळी लवकर कामावर जाणाऱ्या महिलांना या निर्णयाचा तुर्तास फायदा होणार नसल्याने त्यांच्यात नाराजी दिसून येत आहे.

All women are allowed to travel in local trains on the backdrop of Navratri; Thackeray government's relief to women

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT