अंबरनाथला शहरबंदी असूनही नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरूच
अंबरनाथ ः अंबरनाथमध्ये कोरोनाबाधित रुग्णवाढीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, आतापर्यंत शहरात १२६९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच ३१ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आज मंगळवार २३ जूनपासून ३० जूनपर्यंत शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय नगरपालिकेचे प्रशासक आणि उपविभागीय अधिकारी जगदसिंग गिरासे यांनी सोमवारी जाहीर केला. शिवसेनेच्यावतीने शहर बंद ठेवण्याची मागणी केली होती.
आजच्या पहिल्याच दिवशी शहरातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याचे पहावयास मिळाले, मात्र नागरिकांची गर्दी आज मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळाली. शिवाजी चौकात तुरळक प्रमाणात रिक्षा वाहतूक सुरु होती. खाजगी वाहनांची ,वर्दळ नेहमीप्रमाणेच दिसून आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याचा निर्णय होता , त्यानुसार शहरातील सर्व प्रकारची दुकाने सकाळपासून बंद आहेत,, काही नागरिकांना शहर बंदबाबत कल्पना नसल्याने ते घराबाहेर पडले असावेत , मात्र उद्यापासून गर्दी कमी दिसेल असे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.