मुंबई

सर्वात मोठी बातमी - मुंबईत पुढील १५ दिवस कडक संचारबंदी, मुंबई पोलिस म्हणतात...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी. मुंबईतील कोरोना रुग्णाचा आकडा, मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आलाय. एकीकडे MMR क्षेत्रातील ठाणे आणि नवी मुंबईत पुन्हा कडक लॉकडाऊन लागू  करण्यात आलाय त्याच पद्धतीने आता मुंबईकरांसाठी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

मुंबई पोलिसांकडून आलेल्या माहितीप्रमाणे मुंबईत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रात्री ९ ते सकाळी ५ या काळात मुंबईकरांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. पुढील पंधरा दिवस म्हणजेच आज मध्यरात्रीपासून ते १५ जुलै मध्यरात्रीपर्यंत  ही संचारबंदी असणार आहे. दरम्यान या संचारबंडीच्या वेळेत केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. इतरांना आवश्यक कामांसाठी केवळ २ किलोमीटरच्या परिघात बाहेर पडता येणार आहे.  

एकीकडे सरकारकडून मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा सुरु झालाय. मात्र सरकारकडून ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. या आधीच्या नियमांनुसारच हा ही लॉकडाऊन घेण्यात येणार आहे. दरम्यान, नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर मुंबई आणि MMR भागात कोरोना रुग्णसंख्या वाढलेली पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर मुबईकरांसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आलाय. 

amid corona strict curfew in mumbai for next 15 days mumbai police shares info 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Semi Final Scenario: भारताला आता फक्त विजय पुरेसे नाही; उपांत्य फेरीसाठीचे गणित पूर्णपणे बदलले

T20 WC, IND vs SA: W,0,W,1,1,W; हार्दिक, रिंकू , अर्शदीप... एकाच षटकात सेम टू सेम OUT! केशव महाराजने ६ चेंडूत फिरवली मॅच

T20 WC, IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने रोखला भारताचा विजयी रथ! अहमदाबादमध्ये मोठा उलटफेर, सुपर-८ मध्ये चुरस वाढली

Devendra Fadnavis: अजितदादांच्या अपघात झालेल्या विमानातून मीही...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, काय म्हणाले?

Mumbai: मुंबईत प्रवेश करताना दिसणार भव्य स्वागतद्वार! सर्व एंट्री पॉइंट्सवर प्रवेशद्वार बांधणार; रितू तावडेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT