मुंबई

मोठी बातमी : राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर भाजपकडून भूमिका जाहीर 

सकाळवृत्तसेवा

मुंबई-  महाराष्ट्रातल्या राजकारणात चांगलंच ढवळून निघाल्याचं चित्र आहे. सोमवारी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राणेंनी ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं असून या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी केली. त्यावर आता राणे यांना त्यांचाच पक्ष भाजपनं झटका दिला आहे. राणेंनी राज्यपालांकडे केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका किंवा मागणी नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलं आहे.

नारायण राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. तशी मागणी भाजपने केलेली नाही. ती राणेंची वैयक्तिक मागणी असल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. 

भेटीदरम्यान काय म्हणाले होते नारायण राणे

सध्या राज्यातली कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आणि मृतांचा वाढत आहेत. राज्यपालांनी याकडे गांभीर्याने पाहावं आणि राज्यात होणारे मृत्यू थांबवून त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत.  मनपा आणि राज्य सरकारच्या रुग्णालयांची अवस्था वाईट असल्यानं अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल न केल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारचं लक्ष नाही असं म्हणणार नाही, त्यांचं हे काम नाही. राज्यात कोरोनासारखी परिस्थिती हे सरकार हाताळू शकत नसल्याचं राणे म्हणाले होते.

हे सरकार उपाययोजना करु शकत नाही, प्राण वाचवू शकत नाही. या सरकारची कोरोना सारख्या व्हायरसचा सामना करण्याची क्षमता नाही, त्यामुळे यांना नारळ द्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राणे यांनी राज्यपालांकडे केली होती. 

शिवसेनेचा राणेंवर पलटवार 

राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर गुजरातमधून सुरुवात झाली पाहिजे. गुजरातमधील उच्च न्यायालयाने कोरोना हाताळण्यासंबंधी निष्कर्ष काढला आहे ते गंभीर आहे. गुजरातमध्ये सरकारी रुग्णालये स्मशाने झालेत, अंधार कोठड्या झाली आहेत असे गुजरात हायकोर्टाने सरकारवर ताशेरे ओढलेत. तिथल्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून समज द्यायला हवी होती आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

महाराष्ट्राचं सरकार, ठाकरे सरकार... राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर प्रमुख पक्ष यांच्या महाविकास आघाडीचं बनलं आहे. हे सरकार संपूर्ण 5 वर्षांचा कालावधी पूर्ण करणार असून पुढील निवडणुकाही आम्ही एकत्रच लढणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

bjp clears their stand about narayan ranes demand of implementing presidential rule in maharashtra


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

Zilla Parishad Election: मतदानाच्या एक दिवस आधी गैरहजर! ३५ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे अन् निलंबन

Epstein files: 'एपस्टीन'चे नराधम! लहान मुलांचा बळी देऊन मांस खायचे? नव्या कागदपत्रांमध्ये नरभक्षणासंदर्भात स्पष्ट उल्लेख

U19 World Cup: 'सूर्याला तुम्ही थांबवू शकत नाही...' वैभव सूर्यवंशीच्या वादळी १७५ धावानंतर सेहवागची पोस्ट चर्चेत

Chandrapur Election: चंद्रपूरमध्ये 'असा' निघाला तोडगा! वडेट्टीवार–धानोरकर वादावर पडदा

SCROLL FOR NEXT