मुंबई

आशिष शेलार बॅकफूटवर, 'त्या' वक्तव्यावरून मागितली माफी..

सकाळवृत्तसेवा

महाराष्ट्रात आज सकाळीच वाद पेटला तो मुख्यमंत्र्यांनी सामानाला दिलेल्या मुलाखतील वक्तव्यावरून आणि त्यावर आलेल्या भाजप नेते आशिष शेलार यांच्या प्रतिक्रियेवरून. 

"राज्यात नवा नागरिकत्व कायदा लागू होणार नाही" असं परखड मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत मांडलंय. यावरून आशिष शेलार यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आणि महाराष्ट्र सरकारवर एकेरी शब्दात त्यांनी टीका केली. “हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे, अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?” या एकेरी शब्दात आशिष शेलार यांनी टीका केली होती.

दरम्यान आता आशिष शेलार यांनी आपल्या 'त्या' वक्तव्याची माफी मागितली आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दल खुलासा केलाय. या पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार म्हणालेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीत त्यांनी राज्य पुढे कसं नेईन, शेतक-यांना कसा दिलासा देतील, युवकांचे-रोजगाराचे प्रश्न कसे सोडवतील ? याचा रोडमॅप असावा अशी अपेक्षा होती पण यात अनैसर्गिक आघाडीचा खुलासा होता. ही सपशेल अपयशी मुलाखत आहे 

दरम्यान वादग्रस्त वक्तव्याकर बोलताना आशिष शेलार म्हणालेत, "मी व्यक्तिगत  कुणाचा उल्लेख केलेला नाही. माझ्या वक्तव्याने जर कुणाची भावना दुखावली गेली असेल तर मी माफी मागतो. सामनामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर वक्तव्य केलं, यावरून राजकीय हेतुने घेतलेले निर्णय कसे पचवता येत नाहीये हे यातून दिसतंय. आम्हाला कोणाला हिंदुत्व शिकवायचं नाहीये पण जनतेच्या प्रश्नांची उत्तरं आम्ही विचारणार. जे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे ते दिसतंय का? असा प्रश्न आहे", असं शेलार म्हणालेत. 

bjp leader ashish selar apologies for his controvertial statement about uddhav thackeray and state government 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT