bjp maha 
मुंबई

...म्हणून राज्यातील भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : धूलिवंदनाच्या दिवशी भाजपने मध्य प्रदेशमध्ये राजकीय रंगाची उधळण केल्याने कमलनाथ सरकार कोसळण्याच्या मार्गावर आहे. मध्य प्रदेशात सुरू असलेल्या वेगवान राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील मरगळलेल्या भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाआघाडी सरकारने नुकतेच १०० दिवस पूर्ण केले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या मूलभूत राजकीय आणि वैचारिक मतभेदांमुळे सरकार फार काळ टिकणार नाही. अंतर्गत मतभेदांमुळे राज्य सरकार कोसळेल, अशी आशा राज्यातील भाजप नेत्यांना होती. त्यामुळे भाजपने सीएए, एनआरसी, सावरकर, मुस्लिम आरक्षण आदी मुद्द्यांवर शिवसेनेची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला; मात्र शिवसेनेनेसुद्धा सीएए आणि मुस्लिम आरक्षणावर आपली रोखठोक भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अयोध्येला भेट दिली. तेव्हा आम्ही भाजपपासून दूर गेलो; हिंदुत्वापासून नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला प्रत्युतर दिले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडणार नसल्याची जाणीव भाजप नेत्यांना झाली.

मात्र, मध्य प्रदेशमध्ये सुरू झालेल्या राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांमध्ये नवा जोश निर्माण झाला आहे. सत्ता गमावल्यानंतर भाजपमध्ये नाराज नेत्यांची संख्या वाढली होती; मात्र उशिरा का होईना नाराज नेत्यांची दिल्लीदरबारी दखल घेतली गेली. राज्यात भाजपमधील अंतर्गत नाराजी दूर होण्याची अपेक्षा भाजप 
नेतृत्वाला आहे.

शिवसेना नव्याने विचार करेल...
मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रकारे फोडाफोडीचे राजकारण झाले, तसे राजकारण महाराष्ट्रात करणे शक्‍य नाही, याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता समीकरण बदलायचे असल्यास शिवसेनेला नव्याने साद घालावी लागणार आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आजपर्यंत शिवसेनेला शिंगावर घेण्याची किंवा तीव्र शब्दांत टीका करण्याचे टाळले जात आहे. मध्य प्रदेशातील राजकीय घडामोंडीमुळे शिवसेनेवर मानसिक दबाव येऊ शकतो, त्यामुळे शिवसेना नव्याने विचार करेल, अशी अपेक्षा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.

एकजुटीने कामाला लागतील
काही दिवसांपूर्वी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते. काही नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे संकेतही पक्षश्रेष्ठींनी दिले आहे. त्यामुळे राज्यात भाजपमधील अंतर्गत नाराजी दूर होऊन सर्व जण एकजुटीने कामाला लागतील, अशी अपेक्षा भाजप नेतृत्वाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

तेजश्री प्रधानच्या झी मराठीवर दिसण्यावर स्टार प्रवाहच्या सतीश राजवाडेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, 'ती नायिका आधी...

IND vs ENG 3rd Test: जो रूटचे विक्रमी शतक! भारतासमोर मजबूत भिंतीसारखा राहिलाय उभा; राहुल द्रविड, स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT