मुंबई

मुंबईतही रक्त संकलनाला ब्रेक, कोरोनामुळे मुंबईत रक्ताचा तुटवडा..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना प्रादुर्भावाचा फटका मुंबईतील रक्तपेढ्यांना बसला असून, रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. जमावबंदी लागू झाल्याने रक्तदान शिबिरे घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या धास्तीने नागरिक रक्तदान करण्यास तयार नसल्याचे रक्तपेढ्यांच्या प्रमुखांनी सांगितले. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा शक्‍य होणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मुंबईतील काही रुग्णालयांच्या रक्तपेढ्या आहेत. त्याचप्रमाणे खासगी रक्तपेढ्यांमधून रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा केला जातो. रक्तदान शिबिरे व वैयक्तिक रक्तदात्यांच्या माध्यमातून रक्तपेढ्यांमध्ये रक्त, प्लेटलेट आणि प्लाझ्मा यांचे संकलन केले जाते. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर रक्तदान शिबिरे घेण्यावर बंदी आल्याने दररोजचे रक्तसंकलन पूर्णतः बंद झाले आहे.

  • मुंबईतील स्थिती- 15 ते 20 टक्के
  • रक्तसाठा - 10 ते 12 (दिवस पुरेल इतकाच)
  • प्लेटलेट साठा ०० 

रक्तदान केल्यामुळे कोरोना संसर्गाचा कोणताही धोका नाही. कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावे.
- डॉ. पार्थिव संघवी, सचिव, आयएमए.

रक्तदान शिबिरांवर बंदी असली, तरी नागरिक वैयक्तिकपणे रक्तदान करू शकतात. त्यामुळे भीती न बाळगता नागरिकांनी रक्तदान करावे.
- भीमराव काळे, पल्लवी ब्लड बॅंक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT