भाजप काळात सीबीआयची अवस्था पानटपरीसारखी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह
भाजप काळात सीबीआयची अवस्था पानटपरीसारखी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह  
मुंबई

भाजप काळात सीबीआयची अवस्था पानटपरीसारखी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह!

निसार अली

मालाड : केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) एखाद्या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घेणे आवश्‍यक असल्याचे गुरुवारी (ता.19) सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजप सरकारच्या काळात सीबीआयची अवस्था पानटपरीसारखी झाली आहे. असा हल्लाबोल करत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

सीबीआय भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात जाऊन कोणावरही गुन्हा दाखल करते. ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही, त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर कारवाई केली जाते. हे फक्त भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्यांमध्येच होते. सीबीआयप्रमाणेच अन्य सरकारी संस्थांचाही वापर भाजपकडून केला जातो, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपच्या सुडाच्या राजकारणाला काही अंशी अंकुश बसेल. असेही शेख यावेळी म्हणाले. 

-------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूची फलंदाजी कोलमडली; अवघ्या 24 धावांत गमावल्या 6 विकेट्स, विराटचं अर्धशतकही हुकलं

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT