मुंबई

मुंबईत क्वारंटाईन होण्यापासून वाचण्यासाठी दिल्लीतील CBI पथक उचलणार अशी पावलं

सुमित बागुल

मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी CBI चं दहा अधिकाऱ्यांचं पथक आज संध्याकाळी मुंबईत दाखल होतंय. हे सर्वजण पुढील सात दिवसांसाठी मुंबईत असणार आहेत अशी माहिती समोर येतेय. आज संध्याकाळी ७ ते साडे सातच्या सुमारास हे CBI पथक मुंबईत पोहोचणार आहे.

गेल्या वेळेप्रमाणे पुन्हा एकदा तपास अधिकाऱ्यांना क्वारंटाईन व्हायला लागू नये म्हणून या टीमला सात दिवसांच्या आतील रिटर्न तिकीट दाखवावं लागणार आहे. दरम्यान क्वारंटाईन व्हायचं नसल्यास मुंबई महापालिकेकडून 'क्वारंटाईन एक्झम्शन' घ्यावं लागणार आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार CBI ने मुंबई महापालिकेत क्वारंटाईन एक्झम्शनसाठी अर्ज केलेला आहे. मात्र त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो आणि या पार्श्वभूमीवर CBI च्या पथकाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. म्हणजे दिल्लीतून येणारी टीम मुंबईत दाखल झाल्यानंतर ७ दिवसांनी पुन्हा माघारी जाईल. त्यानंतर पुन्हा हे पथक मुंबईत तपस करेल. जोपर्यंत मुंबई महापालिकेकडून एक्झम्शन मिळत नाही तोपर्यंत असंच करण्यात येणार असल्याचं देखील समजतंय. महापालिकेकडून याबाबत क्वारंटाईनबाबत एक्झम्शन मिळालं तर मात्र CBI अधिकारी मुंबईतून माघारी परत न जाता पुढे त्यांचं काम सुरु ठेवतील. 

 पाच टीम्स करणार तपास :   

आज CBI ची टीम मुंबईत दाखल झाल्यानंतर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तातडीने तपास होणार आहे . यासाठी एकूण पाच टीम तयार केल्या जाणार आहेत. या पाचही टीमवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असणार आहे. याबरोबर मुंबईतील CBI स्टाफची देखील मदत घेण्यात येणार आहे.   

cbi team with ten officers will reach mumbai team will stay in mumbai for seven days

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT