मुंबई : मुंबईत आजही अनेक रुग्ण शेवटच्या क्षणी उपचारासाठी येत आहेत. ते कमी झाले पाहिजे. पावसाळ्यात कोरोनाबरोबरच इतर आजारांशी एकत्रित मुकाबला करायचा आहे. त्यासाठी मुंबईमध्ये क्वारंटाईनची सुविधा वाढवितानाच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे निर्देश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ताप-सर्दी चे रुग्ण कोव्हिड केंद्रात येतील, त्याचेही नियोजन करण्यास मुख्यमंत्र्यानी सांगितले.
मुंबईमधील पावसाळ्यातील तयारी आणि कोरोना प्रतिबंध यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव संजय कुमार, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्त, सहाय्यक आयुक्त सहभागी झाले होते. पावसाचे पुढील काही महिने आव्हानाचे आहेत. या काळात सर्दी खोकला तापाच्या रुग्णांची संख्या कोव्हिड उपचार केंद्रात वाढण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
कोरोनासंदर्भात राज्यात जे काम सुरू आहे, त्याबद्दल केंद्रीय पथकाने कौतुक केले आहे. मुंबई यंत्रणा अहोरात्र मेहनत करून कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, लढाई अजून संपलेली नाही. कोरोना रुग्ण अजूनही शेवटच्या क्षणी उपचाराला येण्याचे प्रमाण जास्त आहे. ते कमी झाले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. गणशोत्सवाच्या काळात रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर तसेच प्लाझ्मा दान शिबीर मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.