Mumbai-Ahmedabad National Highway esakal
मुंबई

'या' महामार्गावर चार महिन्यात 12 ठार तर, 28 जण जखमी; काँग्रेसने आंदोलन करत खानिवडे टोलनाका पाडला बंद

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) गेल्या चार महिन्यांपासून सीमांत काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे.

संदीप पंडित

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या चार महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास २८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

विरार : चार महिन्यापासून रेंगाळत सुरु असलेले काँक्रिटीकरण, महामार्गावर होत असलेले अपघात, त्याचबरोबर वारंवार खचणारा महामार्ग आणि रस्त्याच्या कामामुळं होणारी वाहतूक कोंडी या विरोधात आज काँग्रेसचे (Congress) प्रदेश पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक यांच्या नेतृत्वाखाली खानिवडा टोलनाका बंद पाडण्यात आला. याबाबत महामार्गावरील ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणाच्या (Highway Authority) अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) गेल्या चार महिन्यांपासून सीमांत काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. परंतु, या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच डांबरी रस्ता व्यवस्थित असताना ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी हे काम सुरु केल्याचा आरोप वर्तक यांनी केला असून हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचाही आरोप त्यांनी केला.

या महामार्गावर गेल्या चार महिन्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास २८ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पत्र चार पोलीस ठाण्यात देण्यात आले होते. तर, आज सकाळी खानिवडे येथील टोलनाका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंद पडल्याने काही काळ येथील वातावरण तणावपूर्ण झाले होते. जो पर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, असा पवित्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला होता.

यावेळी समीर वर्तक, टोनी डाबरे, अमर पटेल, डेरिक फुर्ट्याडो, टायस फर्नांडिस, अभिजित घाग, निझाम खान उपस्थित होते. या आंदोलनाच्या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाचे ठाण्यातील अधिकारी सुहास चिटणीस यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. दरम्यान, महामार्गावरील अपघातात जीव गेलेल्या नातेवाईकांना घेऊन वर्तक यांनी मांडवी पोलीस ठाण्यात ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल केलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवाशांना दिलासा! ठाणे–मुलुंड दरम्यान नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक पूर्ण होणार; रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन

U19 Asia Cup: पुन्हा भारत - पाकिस्तान फायनल! कधी आणि कुठे पाहाणार लाईव्ह सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

SCROLL FOR NEXT