Lockdown
Lockdown E-Sakal
मुंबई

"महाराष्ट्रात लॉकडाउन वाढवायलाच हवा, कारण..."

विराज भागवत

राज्याचे मंत्री आणि काँग्रेस नेते असलम शेख यांनी दिलं उत्तर

मुंबई: महाराष्ट्रात लॉकडाउन (Maharashtra lockdown) ३१ मे पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे सूतोवाच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) सर्वच मंत्र्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केली. त्यामुळे राज्यातील लॉकडाउन वाढणार हे नक्की असून याबाबतची नियमावली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) २ दिवसात जाहीर करणार आहेत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. लॉकडाउन वाढवणं का गरजेचं आहे, याचं कारण राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी सांगितलं. (Congress Minister Aslam Shaikh Explains why Maharashtra Lockdown Extension is necessary)

"राज्यात असलेला लॉकडाउन नक्कीच वाढला पाहिजे. मला वैयक्तिकदृष्ट्या असं वाटतं की राज्यातील लॉकडाउनमध्ये वाढ केली जावी. कारण, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी जी तयारी राज्याला करायची आहे, ती करण्यासाठी या वाढीव लॉकडाउन फायदा होईल", असं असलम शेख यांनी स्पष्टीकरण दिलं. "राज्याला आणि नागरिकांना तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जे लोक कोविड नियमांचे पालन करत नाहीत, त्यांची अवस्था किती दयनीय होते हे आपण पाहिले आहे", अशा शब्दात त्यांनी नागरिकांना सावधदेखील केले.

"केंद्र सरकारने आता राज्यांना मदत करण्यासाठी स्वत:हून पुढे यायला हवं. लसींचे डोस खरेदी करण्याबाबतच्या निर्बंधांमध्ये केंद्र सरकारने शिथिलता आणायला हवी. जर केंद्र सरकारने लसींच्या आयातीवरील निर्बंध काही अंशी शिथील केले, तर आम्ही राज्यातील संपूर्ण जनतेचं लसीकरण ३ ते ४ महिन्यात पूर्ण करू", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

१८+ च्या लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय

कॅबिनेट बैठकीत राज्यातील १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या वयोगटाचं लसीकरण स्थगित करण्यात आलं आहे. सध्या ४५ वर्षांच्या वरच्या नागरिकांचं लसीकरण करणं गरजेचं असल्याने खरेदी केलेल्या लसी त्या वयोगटाच्या दुसऱ्या डोससाठी वापरल्या जाणार आहेत. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची लवकर अपेक्षा करु नका, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT