मुंबई

मोठी बातमी - सर्व शासकीय कार्यालयं पुढील ७ दिवस राहणार बंद

सकाळवृत्तसेवा

मुंबई - जगभरात कोरोना फोफावलाय. अशात महाराष्ट्रात देखील कोरोनाची प्रचंड दहशत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले जातायत. सरकारकडून काही महत्त्वाची पावलं उचलली जातायत. याचाच भाग मानून मुंबई पुण्या सारख्या शहरांमध्ये कलम १४४  जमावबंदी लागू करण्यात आलीये. अशात १८९७ च्या एपिडेमिक ऍक्ट नुसार कुणीही नियमांचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज अत्यंत महत्वाची मंत्रिमंडळ बैठक पार पडतेय. अशात मुंबईतही सर्वात जास्त गर्दीच्या लोकल ट्रेन्स बंद करण्यावर निर्णय घेण्यात येऊ शकतो. 

महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयं राहणार बंद 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार कडून महत्वाचे निर्णय घेण्यात येतायत. आज कॅबिनेटची बैठक पार पडतेय. अशात महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयं पुढील ७ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत असतात. अशात सरकारी कार्यालयांमधून कोरोना फैलावू नये म्हणून सरकारकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. दरम्यान यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळण्यात येणार असल्याचं समजतंय. 

प्लॅटफॉर्म तिकीट १० वरून ५० वर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द  

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नवीन निर्णयानुसार आता सर्व स्टेशन वरील प्लॅटफॉर्म तिकिट रुपये १० वरून रुपये ५० करण्यात आलंय. याचसोबत महाराष्ट्रातून विशेष करून मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या २३ लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आलाय आहेत. 

corona threat all government offices will be closed for next seven days

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराकडे हवनाऐवजी वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT