मुंबई

...तर लसीकरण थांबवण्याची वेळ आली नसती- भाजप

विराज भागवत

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लसीकरण मोहिमेने वेग घेतला होता. मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दिवसागणिक लाखांच्या संख्येने लसीकरण केलं जात होतं. पण गेले काही दिवसांपासून राज्याकडे असलेला लससाठा संपत आल्याचे चित्र होते. त्यामुळेच राज्यातील अनेक केंद्रांवर लसीकरण थांबल्याचे दिसून आले. केंद्राकडून पाठवण्यात आलेल्या लसीच्या साठ्यांपैकी तीन लाख लसी या राखीव ठेवण्यात आल्या आणि त्यामुळेच लसीकरणाला ब्रेक लागला. तसं केलं नसतं, तर लसीकरण मोहिम थांबवण्याची वेळ आली नसती. त्यामुळे लस तुटवडा हे 'महावसुली आघाडीनिर्मित संकट' आहे, असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.

"महाराष्ट्रात लसीचा असलेला तुटवडा किंवा लसीचे संकट हे महावसुली आघाडी निर्मित संकट आहे. लसीकरण सुरू होऊन दोन महिने झाले. त्यामुळे या लसीकरणाचा हिशेब दिला जायला हवा. महाराष्ट्रात जे लोक पात्र होते त्यांनाच लसी दिल्या गेल्या की जे लोक निकषात बसत नव्हते अशा लोकांना लसी देण्यात आल्या याचाबद्दलची माहिती महाराष्ट्र सरकारने द्यायला हवी. पहिल्या वेळी केवळ ६० वर्षांवरील लोकांना, आरोग्यसेवकांना आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लसी देण्यात येणार होत्या. त्यावेळी काही खास, लाडक्या लोकांना लसी देण्यात आल्या का? कोणाला नियम मोडून लसी देण्यात आल्यात का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत", असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला.

"ठाकरे सरकारने तीन लाख लसींचा साठा राखीव का ठेवला आहे? तो साठा तसा ठेवला नसता तर लसीकरण बंद ठेवावं लागलं नसतं. लसीकरण सुरू झालं तेव्हापासून नियमबाह्य पद्धतीने लसी कोणाकोणाला देण्यात आल्या? लसींबाबत नक्की कोणाला फायदा झाला? या हिशेब महाराष्ट्र सरकारने दिलाच पाहिजे", अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात वेगाने लसीकरण सुरु आहे. आवश्यकते इतक्या लसींचा पुरवठा होत नसल्याने, राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. काल मुंबईसह राज्याच्या अनेक भागात लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी आले होते. पण रुग्णालये, लस केंद्रांवर लसी नसल्यामुळे नागरिकांना माघारी पाठवून द्यावे लागले होते. पण शनिवारी सकाळी लसीचे ९९ हजार बॉक्सेस मुंबईत येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Union Budget Focus on Election-Bound States : बंगाल, आसाम, केरळसह निवडणूका होणाऱ्या राज्यांना मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून नेमंक काय मिळालं?

Budget 2026: अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायाला नवे बळ! कोळंबी आणि इतर मासे खाद्य स्वस्त होणार; सीफूड निर्यातीसाठी मोठा निर्णय

U19 World Cup, IND vs PAK: वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद, पण वेदांत त्रिवेदीचं झुंजार अर्धशतक; भारताचे पाकिस्तानसमोर मोठं लक्ष्य

Indian Royal Family : भारतातील 5 महान राजांचे वंशज काय आज करतायत? कसे आहे त्यांचे जीवन..पाहा ऐतिहासिक वारसा

Ranji Trophy 2026 : थोडी खुशी जादा गम! उत्तरप्रदेशला नमवूनही विदर्भ संघ स्पर्धेबाहेर, मोखाडे अन् मालेवार विजयाचे शिल्पकार

SCROLL FOR NEXT