Dhanajay Munde Meets Devendra Fadnavis Sakal
मुंबई

धनंजय मुंडे रात्री सागर बंगल्यावर; फडणवीसांची घेतली भेट

शांत होऊ पाहणारं राजकारण पुन्हा तापणार का? आता कोणतं नवं वळण येणार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातलं राजकारण आत्ता कुठे शांत होत असल्याची चिन्हं दिसत आहेत. पण आता पुन्हा एकदा राजकारणाच्या गोटात खळबळ माजणार का, अशा चर्चा सुरू होऊ लागल्या आहेत. याचं कारण म्हणजे धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची रात्री उशिरा झालेली भेट. (Dhanajay Munde Meets Devendra Fadnavis)

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही भेट पार पडली. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. ही कोणत्या नव्या राजकीय अंकाची नांदी आहे, असाही प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला आहे. मात्र धनंजय मुंडेंनी या शक्यता फेटाळल्या आहेत. उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल आपण फडणवीसांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

तसंच एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या गोव्यात आहेत. मात्र ते जेव्हा मुंबईत परत येतील, तेव्हा त्यांची भेट घेऊन आपण त्यांचंही अभिनंदन करणार असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं. मात्र सध्या राज्यात होणाऱ्या नाट्यमय घडामोडी पाहता (Maharashtra Politics) रात्री उशिरा झालेल्या या भेटीमुळे नव्या सत्तानाट्याचे संकेत मिळत आहेत. आता या दोघांच्या भेटीबद्दल अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. 2019 साली अजित पवार - देवेंद्र फडणवीस यांचं पहाटेचं सरकार आलं होतं, त्याआधीच्या रात्री उशिरा ते कुठेतरी बाहेर गेले होते. आत्ताही तसंच घडत असल्यानं राजकीय विश्लेषकांनी शंका व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT