मुंबई- लोकसभा निवडणुकांची कृपा आपल्यावर आहे की नरेंद्र मोदींनी जगभरातील गावांचं पाणी पिऊन आता आपल्या देशात दौरे सुरु केले आहेत. यानिमित्ताने आमच्या पंतप्रधान मोदींना मी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची, शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांची, बेरोजगारांची, भुकेल्या जनतेची यादी पाठवणार असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. मुंडे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधानांनी जमल्यास भाषणबाजीतून वेळ मिळालाच तर त्यांना नक्की भेटायला हवे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले होते की, पुढील काही दिवसात मी आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देशभर प्रवास करणार आहे. आज मी मेरठ (उत्तर प्रदेश), रुद्रपुर (उत्तराखंड) आणि जम्मू (जम्मू-काश्मीर) येथिल प्रचारसभांना संबोधित करणार असल्याचे सांगितले होते. मोदींच्या या ट्विटला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी ही टीका केली असून त्यांनी म्हटले आहे की भाषणबाजीतून वेळ मिळालाच तर मी दिलेल्या यादीतील लोकांना नक्की भेटायला हवे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.